शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नागपूर ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’,८७ लाखांचे तडजोडशुल्क वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:10 IST

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईचा आलेख पाहता ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनांमध्येही घट झाली असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली.

ठळक मुद्दे२४६८ अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईचा आलेख पाहता ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनांमध्येही घट झाली असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली.वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ मे २०१७ २०१७ शी १ जानेवारी ते ३१ मे २०१८ सोबत तुलना करून ‘ग्राफ’ बनविला. त्यात अपघातामध्ये घट आणि कारवाईमध्ये अग्रेसर असल्याचे स्पष्टपणे दिसते. जिल्हा वाहतूक शाखेने जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस स्टेशन आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यावतीने वेळोवेळी कारवाई केली. त्यामुळेच हे यश वाहतूक शाखेला येऊ शकले. विना हेल्मेट मोटरसायकल चालविणे, ट्रिपल सिट मोटरसायकल चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वाहनावर रिफ्लेक्टर नसणे, स्कूल बस चालकाने युनिफॉर्म न वापरणे, स्कूल बसमध्ये अटेंडंट नसणे, वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, बसस्थानकाजवळ २०० मीटरच्या आत वाहन पार्क करणे, धोकादायकरीत्या रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणे, ओव्हरलोड वाहतूक करणे आदीसंबंधांने वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविली.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक (गृह) कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आसिफ शेख, त्यांचे पथक, जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेला हातभार लावला.अपघातप्रवण स्थळाची यादी, उपाययोजनाजिल्हा वाहतूक शाखेने नागपूर जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची यादी तयार केली. त्यासंबंधाने तेथे उपाययोजना केली. तेथे फलक लावले. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण कमी झाले. १ जानेवारी ते ३१ मे २०१७ या कालावधीत १५० अपघात होऊन १६१ जणांना जीव गमवावा लागला. तर या अपघातांमध्ये ५१९ जण जखमी झाले. तर १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालवधीत अपघातांची संख्या घटून ती १२७ पर्यंत आली. त्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू तर ४२७ जण जखमी झाले. वाहतूक शाखेने केलेल्या उपाययोजनेमुळेच हे शक्य झाले. केवळ पाच महिन्यांचा हा आलेख आहे, हे विशेष!कारवाईमध्ये वाढवाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३१ मे १७ पेक्षा १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालावधीत कारवाईची संख्या वाढून तडजोड शुल्कही मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आले. १ जानेवारी २०१७ ते ३१ मे २०१७ या कालावधाीत अवैध प्रवासी वाहतुकीची २२२१ कारवाईसह राँग साईड वाहन चालविणे तसे इतर मोटर वाहन अशा एकूण २२ हजार ३१८ केसेस नोंदविल्या गेल्या. तर १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या पाच महिन्यांत २४६८ अवैध प्रवासी वाहतूक, २१३६ राँग साईड केसेस, इतर मोटर वाहन केसेस २० हजार ६१९ अशा एकूण २५ हजार २२३ कारवाई नोंदविल्या गेल्या. यामध्ये तब्बल २५१४ कारवाई मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. एवढेच काय तर २०१७ च्या कालावधीत ८२ लाख ३ हजार ७०० रुपये आकारण्यात आलेल्या तडजोड शुल्कात २०१८ मध्ये वाढ झाली. १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालावधीत ८७ लाख ४१ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करून शासन दरबारी जमा करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी