शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नागपूर ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’,८७ लाखांचे तडजोडशुल्क वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:10 IST

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईचा आलेख पाहता ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनांमध्येही घट झाली असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली.

ठळक मुद्दे२४६८ अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईचा आलेख पाहता ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनांमध्येही घट झाली असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली.वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ मे २०१७ २०१७ शी १ जानेवारी ते ३१ मे २०१८ सोबत तुलना करून ‘ग्राफ’ बनविला. त्यात अपघातामध्ये घट आणि कारवाईमध्ये अग्रेसर असल्याचे स्पष्टपणे दिसते. जिल्हा वाहतूक शाखेने जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस स्टेशन आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यावतीने वेळोवेळी कारवाई केली. त्यामुळेच हे यश वाहतूक शाखेला येऊ शकले. विना हेल्मेट मोटरसायकल चालविणे, ट्रिपल सिट मोटरसायकल चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वाहनावर रिफ्लेक्टर नसणे, स्कूल बस चालकाने युनिफॉर्म न वापरणे, स्कूल बसमध्ये अटेंडंट नसणे, वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, बसस्थानकाजवळ २०० मीटरच्या आत वाहन पार्क करणे, धोकादायकरीत्या रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणे, ओव्हरलोड वाहतूक करणे आदीसंबंधांने वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविली.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक (गृह) कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आसिफ शेख, त्यांचे पथक, जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेला हातभार लावला.अपघातप्रवण स्थळाची यादी, उपाययोजनाजिल्हा वाहतूक शाखेने नागपूर जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची यादी तयार केली. त्यासंबंधाने तेथे उपाययोजना केली. तेथे फलक लावले. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण कमी झाले. १ जानेवारी ते ३१ मे २०१७ या कालावधीत १५० अपघात होऊन १६१ जणांना जीव गमवावा लागला. तर या अपघातांमध्ये ५१९ जण जखमी झाले. तर १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालवधीत अपघातांची संख्या घटून ती १२७ पर्यंत आली. त्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू तर ४२७ जण जखमी झाले. वाहतूक शाखेने केलेल्या उपाययोजनेमुळेच हे शक्य झाले. केवळ पाच महिन्यांचा हा आलेख आहे, हे विशेष!कारवाईमध्ये वाढवाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३१ मे १७ पेक्षा १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालावधीत कारवाईची संख्या वाढून तडजोड शुल्कही मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आले. १ जानेवारी २०१७ ते ३१ मे २०१७ या कालावधाीत अवैध प्रवासी वाहतुकीची २२२१ कारवाईसह राँग साईड वाहन चालविणे तसे इतर मोटर वाहन अशा एकूण २२ हजार ३१८ केसेस नोंदविल्या गेल्या. तर १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या पाच महिन्यांत २४६८ अवैध प्रवासी वाहतूक, २१३६ राँग साईड केसेस, इतर मोटर वाहन केसेस २० हजार ६१९ अशा एकूण २५ हजार २२३ कारवाई नोंदविल्या गेल्या. यामध्ये तब्बल २५१४ कारवाई मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. एवढेच काय तर २०१७ च्या कालावधीत ८२ लाख ३ हजार ७०० रुपये आकारण्यात आलेल्या तडजोड शुल्कात २०१८ मध्ये वाढ झाली. १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालावधीत ८७ लाख ४१ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करून शासन दरबारी जमा करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी