शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नागपूर ग्रामीण भागात अवघ्या ५०० रुपयासाठी होतेय जीवघेणी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:31 IST

बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.

ठळक मुद्देकोरोना उपाययोजनांची पायमल्ली ‘ब्रेक’ लावण्यासाठी पुढाकार घेणार कोण?

श्याम नाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमांमध्ये आणि गरीब लाभार्थी बँक शाखांमध्ये याची पायमल्ली करीत आहेत. बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदीमुळे मजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना शासनासह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मदतही केली जात आहे. याच काळात केंद्र शासनाने नागरिकांच्या जनधन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा केले आणि या रकमेची उचल करण्यासाठी खातेदारांनी कशाचीही पर्वा न करता बँकेकडे धाव घेतली. दुसरीकडे, या रकमची वेळीच उचल न केल्यास ती परत जाईल, अशा अफवाही पसरविण्यात आल्या. या अफवांच्या मुळाशी नेमके कोण आहे, याचा तपास करण्याच्या भरीस कुणी पडत नाही.बहुतांश जनधन खाती देवाणघेवाण न केल्याने ती पूर्वीच ‘इन अ‍ॅक्टिव्ह’ झाली आहेत. त्यामुळे बँक कर्मचारी ही खाती वेळेवर ‘केवायसी’ करीत ‘अ‍ॅक्टिव्ह’ करीत आहेत. या प्रक्रियेत प्रत्येकी १५ ते २० मिनिट जात असून बँक कर्मचाऱ्यांना ‘इंटरनेट स्पीड‘ व ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येचा सामना करावा लागत आहे. उन्हामुळे खातेदारांचेही हाल होत आहे. त्यांना साधे पिण्याचे पाहणीही मिळत नाही. हा प्रकार तालुक्यातील नरखेडसह मोवाड, सावरगाव, जलालखेडा, थडीपवनी, भारसिंगी, लोहारीसावंगा, भिष्णूर व इतरही ठिकाणच्या बँक शाखांमध्ये दिसून येतो. काही शाखांसमोर पेन्डॉल तयार केले आहेत.

दार बंद करून कामकाजया गर्दीत इतर खातेदार, शेतकरी, निवृत्ती वेतनधारक व व्यापाऱ्यांनीही भर टाकली आहे. गर्दी टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी बँकांचे दार बंद करून कामकाज करणे सुरू केले आहे. दारातून कर्मचाऱ्याला पासबुक, विड्रॉवल स्लिप दिली जाते. विशेष म्हणजे, जनधन, निवृत्तीवेतन व काही शासकीय योजनांच्या खातेदारांना एटीएम कार्ड दिले जात नाही. शिवाय, तालुक्यातील ९० टक्के एटीएममध्ये अलीकडच्या काळात रक्कम भरली नाही.

बँक कर्मचाऱ्यांचे ‘अप-डाऊन’नरखेड तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. ते रोज नागपूर शहरातून खासगी वाहनांनी शाखांमध्ये ये-जा करतात. या काळात ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यात कोण कोरोनाबाधित आहे, याची माहिती त्या कर्मचाऱ्यांनाही नसते. सध्या तालुक्यात एकही कोरोनाबाधित किंवा संशयित नाही. परंतु, बँक कर्मचाऱ्यांचा हा प्रवास खातेदारांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकतो.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस