शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागात अवघ्या ५०० रुपयासाठी होतेय जीवघेणी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:31 IST

बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.

ठळक मुद्देकोरोना उपाययोजनांची पायमल्ली ‘ब्रेक’ लावण्यासाठी पुढाकार घेणार कोण?

श्याम नाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमांमध्ये आणि गरीब लाभार्थी बँक शाखांमध्ये याची पायमल्ली करीत आहेत. बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदीमुळे मजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना शासनासह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मदतही केली जात आहे. याच काळात केंद्र शासनाने नागरिकांच्या जनधन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा केले आणि या रकमेची उचल करण्यासाठी खातेदारांनी कशाचीही पर्वा न करता बँकेकडे धाव घेतली. दुसरीकडे, या रकमची वेळीच उचल न केल्यास ती परत जाईल, अशा अफवाही पसरविण्यात आल्या. या अफवांच्या मुळाशी नेमके कोण आहे, याचा तपास करण्याच्या भरीस कुणी पडत नाही.बहुतांश जनधन खाती देवाणघेवाण न केल्याने ती पूर्वीच ‘इन अ‍ॅक्टिव्ह’ झाली आहेत. त्यामुळे बँक कर्मचारी ही खाती वेळेवर ‘केवायसी’ करीत ‘अ‍ॅक्टिव्ह’ करीत आहेत. या प्रक्रियेत प्रत्येकी १५ ते २० मिनिट जात असून बँक कर्मचाऱ्यांना ‘इंटरनेट स्पीड‘ व ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येचा सामना करावा लागत आहे. उन्हामुळे खातेदारांचेही हाल होत आहे. त्यांना साधे पिण्याचे पाहणीही मिळत नाही. हा प्रकार तालुक्यातील नरखेडसह मोवाड, सावरगाव, जलालखेडा, थडीपवनी, भारसिंगी, लोहारीसावंगा, भिष्णूर व इतरही ठिकाणच्या बँक शाखांमध्ये दिसून येतो. काही शाखांसमोर पेन्डॉल तयार केले आहेत.

दार बंद करून कामकाजया गर्दीत इतर खातेदार, शेतकरी, निवृत्ती वेतनधारक व व्यापाऱ्यांनीही भर टाकली आहे. गर्दी टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी बँकांचे दार बंद करून कामकाज करणे सुरू केले आहे. दारातून कर्मचाऱ्याला पासबुक, विड्रॉवल स्लिप दिली जाते. विशेष म्हणजे, जनधन, निवृत्तीवेतन व काही शासकीय योजनांच्या खातेदारांना एटीएम कार्ड दिले जात नाही. शिवाय, तालुक्यातील ९० टक्के एटीएममध्ये अलीकडच्या काळात रक्कम भरली नाही.

बँक कर्मचाऱ्यांचे ‘अप-डाऊन’नरखेड तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. ते रोज नागपूर शहरातून खासगी वाहनांनी शाखांमध्ये ये-जा करतात. या काळात ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यात कोण कोरोनाबाधित आहे, याची माहिती त्या कर्मचाऱ्यांनाही नसते. सध्या तालुक्यात एकही कोरोनाबाधित किंवा संशयित नाही. परंतु, बँक कर्मचाऱ्यांचा हा प्रवास खातेदारांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकतो.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस