शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपुरात विलगीकरण कक्षातील नागरिकांसाठी तीन महिन्यात जेवणावर ८५ लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:27 IST

एप्रिल ते जून या तीन महिन्यात नागपूर शहरातील विविध विलगीकरण केंद्रांमध्ये जेवणावर ८५ लाख रुपयांचा खर्च झाला.

ठळक मुद्दे दिवसाला दीड हजाराहून अधिक संशयितांना सरासरी ८८ हजारात कसे मिळाले जेवण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या महामारीचा अद्यापदेखील नागपूरकर सामना करत आहेत. लॉकडाऊन लागल्यापासून संशयितांचे विविध ठिकाणी विलगीकरण करण्यास सुरुवात झाली. विलगीकरण केंद्रांत नागरिकांच्या जेवणाची सोय मनपा प्रशासनाकडूनच करण्यात येत आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात शहरातील विविध विलगीकरण केंद्रांमध्ये जेवणावर ८५ लाख रुपयांचा खर्च झाला. या कालावधीत सरासरी प्रत्येक दिवशीचा खर्च हा ८८ हजारांच्या घरात होता. मात्र १ मेपासून विलगीकरण केंद्रातील लोकांची संख्या लक्षात घेता दर दिवशी जेवणाचा खर्च लाखांच्या घरात जाणे अपेक्षित होते. अशा स्थितीत केवळ ८८ हजारांत हजारो लोकांचे दोन्ही वेळचे जेवणाची व्यवस्था कशी काय झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मनपाच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली होती. २५ मार्च ते ३० जून या कालावधीत विलगीकरण कक्षात राहणाऱ्यांच्या जेवणावर किती खर्च झाला, कोरोनासाठी मनपाला राज्य किंवा केंद्र शासनाने किती रक्कम दिली व त्यातील किती रक्कम खर्च झाली इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २५ मार्च ते ३० जून या कालावधीत विलगीकरण कक्षांमधील लोकांच्या जेवणावर एकूण ८५ लाख ८९ हजार ९१० रुपये खर्च झाले. याचाच अर्थ सरासरी दररोज ८८ हजारांच्या आसपास खर्च झाला. एप्रिल महिना सोडला तर विलगीकरण कक्षांमध्ये दीड हजारांहून अधिकच लोक होते. ३० एप्रिल रोजी १ हजार ६७८ लोक होते, तर ३१ मे रोजी ही संख्या १ हजार ९२६ वर झाली. ३० जून रोजी संशयित रुग्णांची संख्या १ हजार ७८५ इतकी होती. या कालावधीत दररोजचे दीड हजार रुग्ण जरी पकडले तरी दोन वेळचे जेवण केवळ ६० ते ७० रुपयांत उपलब्ध झाल्याचे दिसून येते. इतक्या कमी किमतीत सकस जेवण मिळणे कितपत शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.- तीन महिन्यात केवळ ३९ टक्के रक्कम खर्च२५ मार्च ते ३० जून या कालावधीत मनपाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ५ कोटी २८ लाख रुपये प्राप्त झाले. यापैकी २ कोटी ७ लाख ९३ हजार ३५६ रुपयांची रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली. तीन महिन्यात मिळालेल्यापैकी केवळ ३९.३८ टक्के रक्कम खर्च झाली. यातील ९१ हजार १०० रुपये हे प्लास्टिकच्या खुर्च्यांवर खर्च झाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस