शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

 नागपुरात गुलाब, मोगऱ्याचा सुगंध महागला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:26 IST

लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे लग्नसराईत फुले महागच : सजावटीची फुलांची आवक कमी

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.शुभकार्यांना विविध प्रकारच्या फुलांची गरज भासते. मे महिन्यासह जूनमध्येही लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. जादा फुलांची मागणी विक्रेत्यांकडे अगोदरच करावी लागत आहे. कडक ऊन आणि पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नाजूक फुले कोमेजून जात आहेत. त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी असून दरदिवशी आणि तासातासात भाव बदलत असल्याची माहिती अरोमा फ्लॉवरचे संचालक आणि महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.गुलाब व मोगऱ्याला सर्वाधिक मागणीलग्नसराईत मोगरा, गुलाब, निशिगंधा आणि सजावटीच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. गुलाब पुणे, मुक्ताईनगर, धुळे, बेंगळुरू येथून येत आहे. शुक्रवारी २०० ते २५० रुपये किलो भाव होते. पण सर्वाधिक चढउतार मोगऱ्याच्या भावात होत आहे आवक वर्धा रोड आणि नागपूरलगतच्या ४० कि़मी. क्षेत्रातून होते. सिंचनाच्या सोईसुविधा झाल्यामुळे मोगऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.शहरात लग्नाची संख्या पाहता मोगऱ्याच्या दरात दर तासाला चढउतार होत आहे. सीताबर्डी येथील महात्मा फुले पुष्प बाजारात बुधवारी मोगरा ४०० ते ६०० रुपये किलो, गुरुवारी घट होऊन २०० ते ३०० रुपये आणि शुक्रवारी पुन्हा वाढ होऊन भाव ४०० रुपयांवर दर स्थिरावले होते. शेतकऱ्यांकडून आवक कमीजास्त असल्याचा भावावर परिणाम होत आहे. मोगऱ्यासोबत निशिगंधा फुलाला मागणी आहे. बुधवारी भाव ७० ते ८० रुपये किलो, गुरुवारी १५० ते २५० रुपये आणि शुक्रवारी १५० रुपयांवर स्थिरावले होते. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन जमत नसल्यामुळे उत्पादन कमी आहे. शेतकरी बाजारात दरदिवशी कमीजास्त आवक असल्यामुळे भावातही चढउतार होत असल्याचे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय