शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

 नागपुरात गुलाब, मोगऱ्याचा सुगंध महागला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:26 IST

लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे लग्नसराईत फुले महागच : सजावटीची फुलांची आवक कमी

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.शुभकार्यांना विविध प्रकारच्या फुलांची गरज भासते. मे महिन्यासह जूनमध्येही लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. जादा फुलांची मागणी विक्रेत्यांकडे अगोदरच करावी लागत आहे. कडक ऊन आणि पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नाजूक फुले कोमेजून जात आहेत. त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी असून दरदिवशी आणि तासातासात भाव बदलत असल्याची माहिती अरोमा फ्लॉवरचे संचालक आणि महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.गुलाब व मोगऱ्याला सर्वाधिक मागणीलग्नसराईत मोगरा, गुलाब, निशिगंधा आणि सजावटीच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. गुलाब पुणे, मुक्ताईनगर, धुळे, बेंगळुरू येथून येत आहे. शुक्रवारी २०० ते २५० रुपये किलो भाव होते. पण सर्वाधिक चढउतार मोगऱ्याच्या भावात होत आहे आवक वर्धा रोड आणि नागपूरलगतच्या ४० कि़मी. क्षेत्रातून होते. सिंचनाच्या सोईसुविधा झाल्यामुळे मोगऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.शहरात लग्नाची संख्या पाहता मोगऱ्याच्या दरात दर तासाला चढउतार होत आहे. सीताबर्डी येथील महात्मा फुले पुष्प बाजारात बुधवारी मोगरा ४०० ते ६०० रुपये किलो, गुरुवारी घट होऊन २०० ते ३०० रुपये आणि शुक्रवारी पुन्हा वाढ होऊन भाव ४०० रुपयांवर दर स्थिरावले होते. शेतकऱ्यांकडून आवक कमीजास्त असल्याचा भावावर परिणाम होत आहे. मोगऱ्यासोबत निशिगंधा फुलाला मागणी आहे. बुधवारी भाव ७० ते ८० रुपये किलो, गुरुवारी १५० ते २५० रुपये आणि शुक्रवारी १५० रुपयांवर स्थिरावले होते. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन जमत नसल्यामुळे उत्पादन कमी आहे. शेतकरी बाजारात दरदिवशी कमीजास्त आवक असल्यामुळे भावातही चढउतार होत असल्याचे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय