शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

नागपूरकरांनी नाकारला जनता कर्फ्यू : सर्व बाजारपेठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 21:36 IST

महापौर संदीप जोशी यांनी २६ आणि २७ सप्टेंबरला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. पण नागपूरकरांनी जनता कर्फ्यू नाकारला असून शनिवारी नागपुरातील सर्वच बाजारपेठा खुल्या होत्या आणि नागरिकांची बाजारात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.कोरोना संसर्गावर कुणीही गंभीर नसल्याचे यावरून दिसून येते.

ठळक मुद्देलोक करताहेत बाजारात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर संदीप जोशी यांनी २६ आणि २७ सप्टेंबरला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. पण नागपूरकरांनी जनता कर्फ्यू नाकारला असून शनिवारी नागपुरातील सर्वच बाजारपेठा खुल्या होत्या आणि नागरिकांची बाजारात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.कोरोना संसर्गावर कुणीही गंभीर नसल्याचे यावरून दिसून येते.महापौरांच्या १९ आणि २० सप्टेंबरच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व बाजारपेठा बंद होत्या, या शिवाय रस्त्यावर गर्दी नव्हती. पण शनिवार, २६ ला जनता कर्फ्यूचे आवाहन नागपूरकरांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. जनता कर्फ्यू म्हणजे लोकांनी स्वत:वर बंधन टाकून कोरोना संसर्गावर नियंत्रण आणावे. जनता कर्फ्यूमध्ये व्यापारी आणि लोकांना सहभागी होण्याचे बंधन नाही, हा निर्णय त्यांनीच घ्यावा, असे महापौरांनी घोषणा करताना जाहीर केले होते. गेल्या आठवड्यात पालन झाले, पण यावेळी कुणीही पालन करताना दिसून आले नाही. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सनेही व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले नाही, हे विशेष.कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता यावर कुणीही गंभीर दिसून येत नाही. याउलट कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी दुकानदार गंभीर झाले आहेत. पूर्वी ऑड-इव्हन रद्द करावे आणि दुकाने रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्यासाठी आंदोलन करणाºया दुकानदारांनी आता दुकाने जास्तवेळ सुरू न ठेवण्याचे बंधन स्वत:वर टाकले आहे. प्रकृती सुदृढ राहिली तर आयुष्यभर व्यवसाय करता येईल, या मूलमंत्राचे पालन करीत व्यापारी दुकाने सायंकाळी ७ च्या आत बंद करीत आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांनाही घरी लवकरच जाण्यास सांगत आहेत. पुढे सणांचे दिवस आहेत. पुढे बाजारात गर्दी वाढल्यास कोरोना संसर्गावर कोण आवर घालणार, असा प्रश्न लोकांच्या बेजबाबदार वागणुकीने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार