शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

नागपूरचा ४५० मेट्रिक टन कचरा कमी झाला : लॉकडाऊनचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:19 IST

नागपूर शहरातील बाजार, रस्ते व चौकात स्वच्छता दिसत असून कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून आता दररोज ७०० मेट्रिक टन कचरा संकलित होत आहे. म्हणजेच ४५० मेट्रिक टन कचरा कमी निघत आहे.

ठळक मुद्देशहरातील दररोजचे कचरा संकलन ११५० वरून ७०० मेट्रिक टनावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातून ए.जी. एनव्हायरो व बीव्हीजी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. परंतु शहरात लॉकडाऊ न सुरू असल्याने प्रमुख बाजारांतील गर्दी कमी झाली आहे. रस्त्यावर वर्दळ नसल्याने शहरातील बाजार, रस्ते व चौकात स्वच्छता दिसत असून कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून आता दररोज ७०० मेट्रिक टन कचरा संकलित होत आहे. म्हणजेच ४५० मेट्रिक टन कचरा कमी निघत आहे.ए.जी. एनव्हायरो या कंपनीला पाच झोनमधील कचरा संकलनाची जबाबदारी दिली आहे. यात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगरचा समावेश आहे. बीव्हीजी या कंपनीक डे गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी या पाच झोनची जबाबदारी दिली आहे. महापालिकेचे ६५०० सफाई कर्मचारी दररोज शहरातील रस्ते स्वच्छ करतात. तर दोन कंपन्यांकडील १८०० सफाई कर्मचारी घराघरातून कचरा संकलन करतात. म्हणजेच ८,३०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. मात्र मागील काही दिवसात कचरा संकलन कमी झाले आहे. सोमवार व मंगळवारी दोन दिवसात सुमारे १४०० मेट्रिक टक कचरा संकलित करण्यात आला.स्वच्छता कर्मचारी दररोज रस्ते व बाजारात सफाई करतात. परंतु वर्दळीमुळे काही तासातच पुन्हा कचरा होतो. तो दिवसभर तसाच पडून असतो. परंतु आता सकाळी स्वच्छ केलेले रस्ते दिवसभर स्वच्छ दिसत आहे. बाजारातही अशीच स्वच्छता दिसत आहे. लॉकडाऊ मुळे कचरा संकलन घटल्याने नागरिक रस्त्यांवर जवळपास ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा करतात.कचऱ्याच्या तक्रारी नाहीएरवी दररोज कचरा पडून असल्याबाबत तक्रारी असतात. परंतु लॉकडाऊ नमुळे आता अशा तक्रारी नाहीत. घरोघरी कचरागाडी फिरत आहे. बाजारात व रस्त्यावर वर्दळ नसल्याने कचरा पडून राहात नाही. घरातील कचरा रस्त्यावर वा सार्वजनिक जागेवर टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. शहरातील रस्ते व बाजार भागात सर्वत्र स्वच्छता दिसत आहे.आयुक्तांच्या आदेशाचाही परिणामशहरातील कचरा संकलनात सुधारणा व्हावी. या हेतूने महापालिकेने दोन कंपन्यांवर कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली. परंतु या दोन्ही कंपन्यांच्या कामाबाबत नागरिक समाधानी नाहीत. अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल या दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. यामुळेही शहरात स्वच्छता दिसण्याला मदत झाली आहे.शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्षलॉकडाऊ नमुळे प्रमुख बाजारात वा रस्त्यावर वर्दळी नसली तरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे मनपाच्या सर्व झोन कार्यालयांना आपापल्या क्षेत्रात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले आहे. शहरातून सुमारे दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित होतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलन घटले असून ते ७०० मेट्रिक टनावर आले आहे. शहरात जागोजागी साचून असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याचे निर्देेश दिले आहेत.डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)मनपा

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका