शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

नागपूरचा ४५० मेट्रिक टन कचरा कमी झाला : लॉकडाऊनचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:19 IST

नागपूर शहरातील बाजार, रस्ते व चौकात स्वच्छता दिसत असून कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून आता दररोज ७०० मेट्रिक टन कचरा संकलित होत आहे. म्हणजेच ४५० मेट्रिक टन कचरा कमी निघत आहे.

ठळक मुद्देशहरातील दररोजचे कचरा संकलन ११५० वरून ७०० मेट्रिक टनावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातून ए.जी. एनव्हायरो व बीव्हीजी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. परंतु शहरात लॉकडाऊ न सुरू असल्याने प्रमुख बाजारांतील गर्दी कमी झाली आहे. रस्त्यावर वर्दळ नसल्याने शहरातील बाजार, रस्ते व चौकात स्वच्छता दिसत असून कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून आता दररोज ७०० मेट्रिक टन कचरा संकलित होत आहे. म्हणजेच ४५० मेट्रिक टन कचरा कमी निघत आहे.ए.जी. एनव्हायरो या कंपनीला पाच झोनमधील कचरा संकलनाची जबाबदारी दिली आहे. यात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगरचा समावेश आहे. बीव्हीजी या कंपनीक डे गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी या पाच झोनची जबाबदारी दिली आहे. महापालिकेचे ६५०० सफाई कर्मचारी दररोज शहरातील रस्ते स्वच्छ करतात. तर दोन कंपन्यांकडील १८०० सफाई कर्मचारी घराघरातून कचरा संकलन करतात. म्हणजेच ८,३०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. मात्र मागील काही दिवसात कचरा संकलन कमी झाले आहे. सोमवार व मंगळवारी दोन दिवसात सुमारे १४०० मेट्रिक टक कचरा संकलित करण्यात आला.स्वच्छता कर्मचारी दररोज रस्ते व बाजारात सफाई करतात. परंतु वर्दळीमुळे काही तासातच पुन्हा कचरा होतो. तो दिवसभर तसाच पडून असतो. परंतु आता सकाळी स्वच्छ केलेले रस्ते दिवसभर स्वच्छ दिसत आहे. बाजारातही अशीच स्वच्छता दिसत आहे. लॉकडाऊ मुळे कचरा संकलन घटल्याने नागरिक रस्त्यांवर जवळपास ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा करतात.कचऱ्याच्या तक्रारी नाहीएरवी दररोज कचरा पडून असल्याबाबत तक्रारी असतात. परंतु लॉकडाऊ नमुळे आता अशा तक्रारी नाहीत. घरोघरी कचरागाडी फिरत आहे. बाजारात व रस्त्यावर वर्दळ नसल्याने कचरा पडून राहात नाही. घरातील कचरा रस्त्यावर वा सार्वजनिक जागेवर टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. शहरातील रस्ते व बाजार भागात सर्वत्र स्वच्छता दिसत आहे.आयुक्तांच्या आदेशाचाही परिणामशहरातील कचरा संकलनात सुधारणा व्हावी. या हेतूने महापालिकेने दोन कंपन्यांवर कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली. परंतु या दोन्ही कंपन्यांच्या कामाबाबत नागरिक समाधानी नाहीत. अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल या दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. यामुळेही शहरात स्वच्छता दिसण्याला मदत झाली आहे.शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्षलॉकडाऊ नमुळे प्रमुख बाजारात वा रस्त्यावर वर्दळी नसली तरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे मनपाच्या सर्व झोन कार्यालयांना आपापल्या क्षेत्रात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले आहे. शहरातून सुमारे दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित होतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलन घटले असून ते ७०० मेट्रिक टनावर आले आहे. शहरात जागोजागी साचून असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याचे निर्देेश दिले आहेत.डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)मनपा

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका