शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर रेल्वेस्थानक; चार कोटींचे काम, दिला एक रुपया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:17 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना न झाल्यामुळे पुन्हा रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वेगाड्या ठप्प होण्याची परिस्थिती .

ठळक मुद्देरेल्वे रुळ होणार जलमयस्थानकाला येईल तलावाचे स्वरूप

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यात दरवर्षी नागपूर रेल्वेस्थानकावर पाणी साचते. रेल्वे रुळावर दोन ते तीन फूट पाणी साचून रेल्वेगाड्या ठप्प होतात. पाणी बाहेर निघण्यासाठी मार्गच नसल्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेकडे १८०० मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यासाठीचे काम रेल्वेच्या पिंकबुकमध्ये समाविष्ट करण्यात आले. या कामासाठी एकूण खर्च ४ कोटी ४१ लाख रुपये येणार आहे. परंतु या कामासाठी पिंकबुकमध्ये केवळ एक रुपयाची तरतूद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना न झाल्यामुळे पुन्हा रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वेगाड्या ठप्प होणार आहेत.नागपूर रेल्वेस्थानकावर साचणारे पाणी बाहेर काढण्याची ब्रिटिशकालीन व्यवस्था आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भाग उंचीचा आहे. यामुळे येथे नेहमीच पाणी साचते. मागील आठ वर्षांपासून यासाठी उपाययोजना करण्यासाठी विभाग पातळीवर चर्चा सुरू आहे. परंतु आतापर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. हीच स्थिती राहिली आणि मुसळधार पाऊस झाल्यास रेल्वेगाड्या रेल्वे रुळावरच ठप्प होतील. यादृष्टीने रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडून पूर्वेकडील भागात १८०० मिलीमीटर पाईपलाईन टाकण्याची योजना आहे. आश्चर्य म्हणजे रेल्वेस्थानकावर, प्लॅटफार्मवर गरज नसताना विकासकामे करण्यात येत आहेत. परंतु पावसाळ्यात रेल्वेगाड्या ठप्प होत असताना पाणी बाहेर काढण्यासाठी विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. जोरात पाऊस आल्यानंतर रेल्वेगाड्या ठप्प होण्याशिवाय रेल्वे प्रशासनाला आणखी नुकसान होऊ शकते. यात रेल्वेची इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त होऊ शकतात. याशिवाय प्रवाशांची गैरसोय होणे हे तर क्रमप्राप्त आहे. एवढी गंभीर समस्या असताना याबाबत रेल्वेच्या संबंधित विभागाने कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे पुन्हा रेल्वे रुळावर पाणी साचून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे, हे विशेष.पश्चिमेकडील भागात होणार तलावपावसाचे पाणी रेल्वेस्थानकाच्या बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नाही. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यास पश्चिमेकडील भागात नेहमीच तलाव होतो. प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणे शक्य होत नाही. लोहमार्ग पोलीस ठाणे आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात पाणी साचते. याशिवाय पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी पाण्यात बुडतात. रेल्वे प्रशासनाने पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना न केल्यामुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार यात शंका नाही.दुसऱ्या शीर्षकाखाली घेतला असेल खर्च‘रेल्वेस्थानकावरील पाणी बाहेर काढण्याच्या कामासाठी पिंकबुकमध्ये संबंधित शीर्षकाखाली एक रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु या कामासाठी दुसऱ्या शीर्षकाखाली खर्चाची तरतूद करण्याची शक्यता आहे.’-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, नागपूर विभागमुसळधार पावसामुळे तीन वर्षांपूर्वी रेल्वे रुळ असे पाण्याखाली बुडाले होते. रेल्वेस्थानकावरील पाणी बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काहीच उपाययोजना न केल्यामुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर