शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

नागपूर-पुणे दुरांतो सुरूकरा

By admin | Updated: January 7, 2016 03:45 IST

नागपूर-पुणे या मार्गावरील रेल्वेगाड्यात नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळते. विदर्भातील चाकरमानी नोकरीनिमित्त आणि बहुतांश विद्यार्थी पुण्याला शिकत असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त असतो.

प्रवाशांची मागणी : प्रतीक्षायादी राहत असल्यामुळे गैरसोयनागपूर : नागपूर-पुणे या मार्गावरील रेल्वेगाड्यात नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळते. विदर्भातील चाकरमानी नोकरीनिमित्त आणि बहुतांश विद्यार्थी पुण्याला शिकत असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त असतो. या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे दोन महिन्यांपूर्वीच आरक्षण फुल्ल झालेले आढळते. त्यामुळे अनेक प्रवाशांना वेटींगचे तिकीट घेऊन प्रवास करण्याची पाळी येते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-पुणे दुरांतो एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.नागपूरवरून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. प्रवासाचे स्वस्त आणि सुरक्षित माध्यम म्हणून प्रवाशी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु नागपूरवरून प्रतिदिवशी एकच रेल्वेगाडी पुण्यासाठी सोडण्यात येते. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी सोमवार, बुधवार आणि शनिवारी सोडण्यात येते. तर १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस ही गाडी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी सोडण्यात येते. या दोन्ही गाड्यात १२ महिने प्रवाशांची भली मोठी प्रतीक्षायादी पाहावयास मिळते. दोन महिन्यांपूर्वीच या मार्गावरील गाड्यांचे आरक्षण फुल्ल होते. नागपूरसह विदर्भातील असंख्य विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी गेलेले असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त राहतो. दिवाळीत नागपूरवरून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ होते. याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक नागपूर-पुणे प्रवासाचे भाडे तीन हजार करीत असल्यामुळे प्रवाशांची मोठी आर्थिक लूट होते. या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-पुणे दुरांतो एक्स्प्रेस ही नवी गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. (प्रतिनिधी)दिल्ली, पुणे दुरांतोसाठी पाठपुरावा करणार‘नागपूरवरून दिल्लीला तसेच पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावर नागपुरातून दुरांतो गाड्या सुरू करणे महत्त्वाचे आहे. याबाबत आगामी रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे बोर्डाला पत्र लिहून खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून या गाड्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी आग्रह करणार आहे.’अजय संचेती, खासदार, राज्यसभा