शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

नागपूर पोलिसांची कामगिरी समाधानकारक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:28 IST

नागपूर मधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकामी पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

ठळक मुद्देअजून सुधारणा करणे आवश्यक

ऑनलाईन लोकमत नागपूर : नागपूर मधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकामी पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.सदस्य सुनील केदार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर पोलीस कार्यक्षम आहे. पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून सुधारणा करुन गुन्ह्यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. नागपूर पोलीस आयुक्तांनी भूमाफियाविरुद्ध कठोर कारवाई केली. त्यांनी यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन केल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. यावर पोलिसांनी कारवाई करत भूमाफियांच्या कब्जात वर्षानुवर्षे असलेली जमीन सामान्य नागरिकांना परत देण्यात आली. यासाठी सर्व स्तरातून नागपूर पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले. नागपूर पोलिसांनी सेफ्टी परसेप्शन इंडिकेशन तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. नागपूर पोलिसांच्या कामात गुणात्मक फरक पडला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी भाग घेतला.‘भरोसा सेल’ अभिनव उपक्रमनागपूर पोलीस आयुक्तालयाने राज्यात अभिनव असा ‘भरोसा सेल’ हा उपक्रम चालू केला असून महिलांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई, समुपदेशन आदी उपक्रम राबविले जातात. त्याचे काम कसे चालते, हे आमदार महिलांनाही दाखवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.व्हीसीएवरील कारवाईची चौकशी होणारसुनील केदार यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पास न दिल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याबाबतचा उपप्रश्नाला उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, विदर्भ क्रिकेट असोसिएशन विरोधात केलेली कारवाई योग्य की अयोग्य या विषयी चौकशी केली जाईल. गरज पडल्यास पुन्हा एसआयटीनागपूर पोलिसांनी भूमाफियांसाठी एसआयटी स्थापित केली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक तक्रारी आल्या. त्यांच्या चार्जशिटही दाखल आहेत. एसआयटी ही परमनंट नव्हती. परंतु गरज पडल्यास पुन्हा एसआयटी स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधाकर देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७