शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी पेरला पोलीस दलात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:10 IST

उपराजधानीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कर्तव्यकठोर निर्णय घेणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलात गोडवा पेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विविध पोलीस ठाण्यात कोजागरी साजरी करण्यात आली. हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.

ठळक मुद्देपहिल्यांदाच ‘दुग्धशर्करा योग’ : पोलीस ठाण्यात हास्यविनोद, गीतगायन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कर्तव्यकठोर निर्णय घेणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलात गोडवा पेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विविध पोलीस ठाण्यात कोजागरी साजरी करण्यात आली. हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.झपाट्याने विकसित होत असलेल्या नागपुरात १२ महिने मोठमोठे कार्यक्रम सुरू असतात. विधिमंडळाचे अधिवेशन, वेगवेगळ्या निमित्ताने येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, सणोत्सव तसेच वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने शहरातील पोलीस वर्षभर बंदोबस्तात गुंतले असतात. तपास, गुन्हेगारी नियंत्रणासाठी धावपळ होत असल्याने त्यांची तारांबळ उडते. ते दडपणात येतात. पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहे. पोलीस तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी चांगली व तत्पर आरोग्य सेवा, पोलिसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधा, अभ्यासासाठी वाचनालय तसेच सुदृढ आरोग्यासाठी जीम अशा सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे, पोलीस आणि त्यांच्या पालकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पोलीस दलात सुसंवाद राहावा, त्यांना एकत्रितपणे कार्यक्रम साजरे करता यावे, यासाठी डॉ. उपाध्याय यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर, नुकताच कोजागरीचा कार्यक्रम शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. कोजागरीचा हा कार्यक्रम केवळ गोडधोड दूध वितरित करण्यापुरताच मर्यादित नव्हता. तर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुक्तांनी त्या त्या पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी-अधिकाऱ्यांना गीत, मिमिक्री, हास्यविनोदाचे सादरीकरण करण्यासही प्रोत्साहित केले. पोलीस ठाण्यात हास्यविनोद, गीतगायन झाले. चिडून ओरडून बोलणारे पोलीस पहिल्यांदाच त्यानिमित्ताने सुसंवाद साधताना दिसले. कोजागरीच्या निमित्ताने एकाच वेळी अनेक ठिकाणी पहिल्यांदाच असा ‘दुग्धशर्करा योग’ दिसून आला.पोलिसांना आनंदी ठेवायचे आहे : आयुक्तजनतेच्या जानमालाच्या सुरक्षेची तसेच सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची पोलिसांवर जबाबदारी आहे. कर्तव्य बजावताना अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी पोलीस दडपणात येतात. त्यामुळे छोट्या छोट्या कार्यक्रमातून त्यांना आनंदी ठेवण्याचे, त्यांना प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. कोजागरीचा उपक्रम त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे, असे यानिमित्ताने लोकमतशी बोलताना डॉ. उपाध्याय म्हणाले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयkojagariकोजागिरी