शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

खेळताना हाय व्होल्टेज तारेला स्पर्श; वेकोली बंकर परिसरात बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 23:37 IST

सिल्लेवाडा काेळसा खाण आवारातील घटना

नागपूर (खापरखेडा) : वेकाेली काेळसा खाणीच्या बंकर परिसरातील रेतीच्या उंच ढिगाऱ्यावर मित्रांसाेबत खेळताना नऊ वर्षीय बालकाचा जवळच असलेल्या विजेच्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित असला तरी मुले या परिसरात राेज खेळतात. याकडे वेकाेली प्रशासनाचे मुळीच लक्ष नसते. ही दुर्दैवी घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा काेळसा खाण परिसरात मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

नक्ष चंद्रपाल साेनेकर (९, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. नक्ष आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून, सिल्लेवाडा येथील शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी हाेता. वेकाेलीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बंकर क्रमांक-५ परिसरात एका रांगेत रेतीचे २५ ते ३० फूट उंच ढिगारे आहेत. त्यावर चढणे व घसरत खाली येणे मुलांसाठी आनंददायी असल्याने रेतीचे ढिगारे त्यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. यातील काही ढिगाऱ्यांवरून व जवळून विजेच्या हाय व्हाेल्टेज तारा गेल्या आहेत. काही ढिगारे तारांपेक्षाही उंच आहेत.नक्ष त्याच्या पाच समवयस्क मित्रांसाेबत या ढिगाऱ्यावर राेज खेळायला जायचा. यातील एका ढिगाऱ्यावर खेळत असताना त्याचा हाय व्हाेल्टेज तारेला स्पर्श हाेताच क्षणभरात त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी घराच्या दिशेने पळ काढला. माहिती मिळताच कुटुंबीयांसह पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून वेकाेली प्रशासनाने नक्षच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरेे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्हमुळात हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नाही. घटनास्थळापासून १०० मीटरवर प्रवेशद्वार असून, तिथे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. असे असताना मुले राेज या रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळायला यायची. त्यांना आजवर एकाही सुरक्षारक्षकाने आत येण्यास प्रतिबंध केला नाही. सुरक्षारक्षकांनी मुलांना आत येऊ दिले नसते तर नक्षचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे वेकाेलीच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.