शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डीजेवर नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:53 IST

डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले.

ठळक मुद्देरिसेप्शन सुरू असताना बाजूला घडला थरार : अजनीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले.मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास अजनीतील धोबी घाट चौकाजवळ ही थरारक घटना घडली. आशुतोष बाबुलाल वर्मा (वय २५, रा. नवीन बाबुलखेडा, धोबी घाट) असे मृत तरुणाचे तर, शुभम नलिन कांबळे (वय २३) असे जखमीचे नाव आहे.बुधवारी २० मे रोजी रामटेक येथे मित्राच्या लग्नात आशुतोष अन्य मित्रांसह गेला होता. तेथे डीजेवर नाचताना ललित ऊर्फ काल्या प्रवेश प्रजापती (वय १९) आणि मनीष ऊर्फ मंशा अशोक रवतेल या दोघांना आशुतोषचा धक्का लागला. या कारणावरून आशुतोषचा ललित तसेच मंशासोबत वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. ललित आणि मंशाने त्याला नागपुरात चल तुझा गेम वाजवतो, अशी धमकी दिली.मंगळवारी सायंकाळी लग्नानंतर रिसेप्शनच्या कार्यक्रमात आशुतोषचा शुभम कटोतेसोबत पुन्हा वाद झाला. त्यावेळी तो कसाबसा सुटला. जेवण झाल्यानंतर आशुतोष घरी गेला. शुभमने आशुतोषला फोन केला. एक मॅटर सलटाने का है, जल्दी चौक मे आ’ असे म्हणत आशुतोषला बोलावून घेतले. तिकडे त्याने ललित आणि मंशा तसेच अन्य आरोपींना आशुतोषला बोलावल्याचे सांगितले. आशुतोष त्याचा मित्र शुभमला घेऊन धोबी घाट चौकात गेला. तेथे शुभम आणि ललित, मंशा, विनू मेश्राम आणि अन्य दोन आरोपी शस्त्र घेऊन होते. एकाने आशुतोषच्या गळ्यात हात घालून त्याला धोबीघाटाकडे नेले. अंधारात नेल्यानंतर आरोपींनी आशुतोषवर प्राणघातक हल्ला चढवला. ते पाहून शुभम कांबळे मदतीला धावला असता आरोपींनी त्यालाही जखमी केले. आशुतोषला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पळून गेले. शुभमने त्याच्या मित्रांना फोन करून तेथे बोलावून घेतले. त्या सर्वांनी आशुतोषला मेडिकलला नेले. तेथे उपचारादरम्यान आशुतोषचा मृत्यू झाला. एकुलत्या एका मुलाची हत्या झाल्याने आशुतोषच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे.त्याची धडपड व्यर्थमित्राला रक्ताच्या थारोळ्यात लोळविणाऱ्या आरोपींना तातडीने अटक व्हावी म्हणून शुभम जखमी अवस्थेतच अजनी ठाण्यात पोहचला. आरोपींना तातडीने अटक करा, अशी विनंती त्याने पोलिसांना केली. मात्र, त्याची धडपड व्यर्थ ठरली. पोलिसांनी वेळकाढू धोरण अवलंबले. त्यामुळे आरोपींना पळून जाण्यास वेळ मिळाला. दरम्यान, आशुतोषच्या हत्येच्या आरोपात अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दोघांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून