शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपुरात डीजेवर नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:53 IST

डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले.

ठळक मुद्देरिसेप्शन सुरू असताना बाजूला घडला थरार : अजनीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले.मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास अजनीतील धोबी घाट चौकाजवळ ही थरारक घटना घडली. आशुतोष बाबुलाल वर्मा (वय २५, रा. नवीन बाबुलखेडा, धोबी घाट) असे मृत तरुणाचे तर, शुभम नलिन कांबळे (वय २३) असे जखमीचे नाव आहे.बुधवारी २० मे रोजी रामटेक येथे मित्राच्या लग्नात आशुतोष अन्य मित्रांसह गेला होता. तेथे डीजेवर नाचताना ललित ऊर्फ काल्या प्रवेश प्रजापती (वय १९) आणि मनीष ऊर्फ मंशा अशोक रवतेल या दोघांना आशुतोषचा धक्का लागला. या कारणावरून आशुतोषचा ललित तसेच मंशासोबत वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. ललित आणि मंशाने त्याला नागपुरात चल तुझा गेम वाजवतो, अशी धमकी दिली.मंगळवारी सायंकाळी लग्नानंतर रिसेप्शनच्या कार्यक्रमात आशुतोषचा शुभम कटोतेसोबत पुन्हा वाद झाला. त्यावेळी तो कसाबसा सुटला. जेवण झाल्यानंतर आशुतोष घरी गेला. शुभमने आशुतोषला फोन केला. एक मॅटर सलटाने का है, जल्दी चौक मे आ’ असे म्हणत आशुतोषला बोलावून घेतले. तिकडे त्याने ललित आणि मंशा तसेच अन्य आरोपींना आशुतोषला बोलावल्याचे सांगितले. आशुतोष त्याचा मित्र शुभमला घेऊन धोबी घाट चौकात गेला. तेथे शुभम आणि ललित, मंशा, विनू मेश्राम आणि अन्य दोन आरोपी शस्त्र घेऊन होते. एकाने आशुतोषच्या गळ्यात हात घालून त्याला धोबीघाटाकडे नेले. अंधारात नेल्यानंतर आरोपींनी आशुतोषवर प्राणघातक हल्ला चढवला. ते पाहून शुभम कांबळे मदतीला धावला असता आरोपींनी त्यालाही जखमी केले. आशुतोषला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पळून गेले. शुभमने त्याच्या मित्रांना फोन करून तेथे बोलावून घेतले. त्या सर्वांनी आशुतोषला मेडिकलला नेले. तेथे उपचारादरम्यान आशुतोषचा मृत्यू झाला. एकुलत्या एका मुलाची हत्या झाल्याने आशुतोषच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे.त्याची धडपड व्यर्थमित्राला रक्ताच्या थारोळ्यात लोळविणाऱ्या आरोपींना तातडीने अटक व्हावी म्हणून शुभम जखमी अवस्थेतच अजनी ठाण्यात पोहचला. आरोपींना तातडीने अटक करा, अशी विनंती त्याने पोलिसांना केली. मात्र, त्याची धडपड व्यर्थ ठरली. पोलिसांनी वेळकाढू धोरण अवलंबले. त्यामुळे आरोपींना पळून जाण्यास वेळ मिळाला. दरम्यान, आशुतोषच्या हत्येच्या आरोपात अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दोघांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून