शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपूर मनपाची तिजोरी रिकामी, पण फुलांवर लाखोंचा खर्च

By admin | Updated: July 15, 2017 17:15 IST

नागपूर महानगरपालिकेची तिजोरी रिकामी असल्याचा दावा अनेकदा अधिकारी-नेत्यांकडून करण्यात येतो. कर्मचा-यांनादेखील याचा फटका बसताना दिसून येतो.

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. 14 - नागपूर महानगरपालिकेची तिजोरी रिकामी असल्याचा दावा अनेकदा अधिकारी-नेत्यांकडून करण्यात येतो. कर्मचा-यांनादेखील याचा फटका बसताना दिसून येतो. मात्र असे असतानादेखील हारतुºयांवर खर्चात बचत करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतलेला नाही. २०१३ सालापासून फुल व पुष्पगुच्छांवरच मनपातर्फे सव्वादोन लाख रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 
 
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मनपाच्या जनसंपर्क विभागाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत पुष्पगुच्छ व हार यांच्यावर किती रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या कालावधीत २ लाख ४३ हजार ३८५ रुपयांचे हार व पुष्पगुच्छ खरेदी करण्यात आले. 
 
अनेकदा मनपाचे काही समारंभ एकापाठोपाठ एक असे असतात. कार्यक्रमांना काही पाहुणे येत नाहीत व त्यांच्यासाठी आणलेले पुष्पगुच्छ वाया जातात. असे पुष्पगुच्छ दुसºया कार्यक्रमांत वापरल्या जाऊ शकतात. मात्र एका समारंभासाठी पुष्पगुच्छ आणल्यानंतर त्याचा परत वापर होत नाही, असे मनपानेच माहितीत स्पष्ट केले आहे. 
 
एकही निविदा नाही 
मनपातर्फे हार व पुष्पगुच्छांसाठी ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी २०१३ व १४ मध्ये ३ वेळा निविदा सूचनादेखील प्रकाशित करण्यात आली होती. मात्र एकही निविदा प्राप्त न झाली नव्हती. मनपाच्या कंत्राटासाठी एकही निविदा प्राप्त न होणे ही आश्चर्याचीच बाब आहे. सध्या वार्षिक दर करारारावर पुष्पगुच्छ व हार पुरविण्यात येतात. 
 
तुळशीचे रोप असताना हारतुरे कशाला ? 
गेल्या काही काळापासून महापालिका कार्यक्रमात तुळशीचे रोपटे देवून सत्कार करण्याची परंपरा आहे. जर तुळशीचे रोप देण्यात येत आहे तर मग परत हारतुरे देऊन जनतेच्या निधीची उधळपट्टी का करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
पुष्पगुच्छ व हारावरील खर्चाची आकडेवारी 
 
वर्ष - खर्च 
२०१३ - ६७,०२० 
२०१४ - ९३,७९० 
२०१५ - २७,१०० 
२०१६-१७ -  ५५,४४५