शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपूर मनपा सभागृहात सत्ताधारी-विरोधक भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०० कोटींच्या कर्जातून पाण्यासाठी ५० कोटी देणे व वनटाईम सेटलमेंटच्या प्रस्तावावरून महापालिके च्या विशेष ...

ठळक मुद्देकर्ज व वनटाइम सेटलमेंटच्या प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०० कोटींच्या कर्जातून पाण्यासाठी ५० कोटी देणे व वनटाईम सेटलमेंटच्या प्रस्तावावरून महापालिके च्या विशेष सभेत मंगळवारी सभागृहात तीन तास वादळी चर्चा झाली. सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप झाले. विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधकांच्या विरोधाला न जुमानता दोन्ही प्रस्तावांना सभागृहात मंजुरी देण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सभा अपेक्षेप्रमाणे वादळी झाली.२०० कोटींचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी येताच अपक्ष नगरसेवक आभा पांडे यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांच्या प्रभागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. काही पदाधिकाऱ्यांचे टँकर सुरू असल्याचा आरोप केला. यावर सत्तापक्षनेते संदीप जोशी व माजी महापौर प्रवीण दटके यांनी आक्षेप घेतला. ज्या लोकप्रतिनिधींचे टँकर सुरू आहेत, त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. थेट कुणावर आरोप करणे चुक ीचे आहे. यावर पांडे यांनी प्रशासनाने माहिती द्यावी अशी मागणी केली. बाल्या बोरकर व दीपक चौधरी यांनीही नावे जाहीर करण्याची मागणी केली. मात्र काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी, मनोज सांगोळे आदींनी पांडे यांचे समर्थन केले. तर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही नाव जाहीर करण्यास सांगितले. थेट लोकप्रतिनिधीवर आरोप होत असल्याने त्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर सत्तापक्ष व विरोधी सदस्यांत आरोप-आरोप प्रत्यारोप झाले. परंतु अखेरपर्यंत नावांचा खुलासा झाला नाही.

योजनांच्या विलंबाला जबाबदार कोण?वनटाईम सेटलमेंटचा मुद्दा महापालिकेच्या आर्थिक स्थितीशी निगडीत आहे. पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. परंतु याबाबतचा प्रस्ताव जेमतेम पाच ओळीचा ठेवण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. निर्धारित कालावधीत योजना पूर्ण न होण्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. असे असतानाही ओसीडब्ल्यूचा वनटाईम सेटलमेंटचा प्रस्ताव आणल्याचा आरोप केला. नगसेवक संदीप सहारे, प्रफुल्ल गुडधे, कमलेश चौधरी, नितीन साठवणे, जुल्फेकार भुट्टो यांच्यासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रशासन व सत्तापक्षाच्या विरोधात नारेबाजी केली. या गोंधळात प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. एनईएसएलच्या बैठकीत विस्तृत चर्चा केल्यानंतर या वनटाईम सेटलमेंटच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. महापालिकेकडून आवश्यक तेव्हा आर्थिक मदत न झाल्याने पाणीपुरवठा योजनांना विलंब झाल्याची भूमिका अपर आयुक्त राम जोशी यांनी मांडली.

योजनेला विलंब होण्याला मनपाही जबाबदारशहरात २४ बाय ७ योजना राबविण्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराला निर्धारित कालावधीत २७१ कोटी द्यावयाचे होते. परंतु १०२ कोटी देण्यात आले. महापालिकेला पेंच-४ प्रकल्प व जलकुंभाची कामे पूर्ण करावयाची होती. याला तीन ते चार वर्ष विलंब झाला. महापालिकेने वेळीच निधी उपलब्ध न के ल्याने प्रकल्पाला विलंब झाला. याला महापालिकाही जबाबदार असल्याची माहिती सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दिली. ओसीडब्ल्यूवर कृपादृष्टीचा प्रश्नच नाही. २०१० मध्ये शहरात जलवाहिनीचे नेटवर्क ८६.५१ कि.मी. होते. आता ते ८७१ कि.मी.झाले आहे. करारानुसार निधी उपलब्ध न झाल्यास व्याज देण्याची तरतूद आहे. परंतु आपण व्याज नाकारले आहे. पुढील सभागृहात ‘अ‍ॅक्शन टेकन’ रिपोर्ट सादर केला जाणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका