शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर महानगरपालिकेतील सुविधा केंद्राच्या फाईलला फुटले पाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:19 IST

नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासोबतच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहराच्या विविध भागात महावितरण व एसएनडीएलच्या बिल भरण्याच्या केंद्रावर मालमत्ता कर व पाणी बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.

ठळक मुद्देमनपाचे उत्पन्न कसे वाढणार?वीज बिल केंद्राच्या ठिकाणी टॅक्स भरण्याची सुविधा

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासोबतच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहराच्या विविध भागात महावितरण व एसएनडीएलच्या बिल भरण्याच्या केंद्रावर मालमत्ता कर व पाणी बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. परंतु याबाबतची फाईल गेल्या सहा महिन्यापासून बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.राज्य शासनाने विशेष अनुदान व जीएसटी अनुदानात वाढ केल्यानंतरही महापालिकेची आर्थिक स्थिती अद्याप सावरलेली नाही. मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता विभाग, नगर रचना व जलप्रदाय विभाग उद्दिष्ट गाठण्यात नापास ठरले आहे. थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.दुसरीकडे नागरिकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने प्रस्तावित असलेल्या सुविधा केद्राचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.नागरिकांना वीज बिल केंद्राच्या ठिकाणी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याची सुविधा नागरी सुविधा विभागाने याबाबतची फाईल मालमत्ता विभागाकडे सहा महिन्यापूर्वी पाठविलेली आहे. परंतु या विभागाकडे ही फाईल प्रलंबित असल्याची माहिती नागरी सुविधा केंद्राचे प्रभारी अधिकारी आर.एस.कांबळे यांनी दिली तर सुविधा केंद्राची फाईल मालमत्ता विभागाकडे प्रलंबित नाही.विभागाने सकारात्मक अभिमत नोंदवून याबाबतची फाईल नागरी सुविधा केंद्र विभागाकडे परत पाठविल्याची माहिती मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. यामुळे सुविधा केंद्राबाबतची फाईल कुठे गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली तर मालमत्ता व पाणीपट्टीच्या वसुलीत काही प्रमाणात निश्चितच वाढ झाली असती.

उपक्रमच बारगळलामहापालिकेच्या कार्यालयात दाखल्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागतात. याचा विचार करता महापालिकेने २००६ मध्ये शहराच्या विविध भागात नागरी सुविधा केंद्र सुरू केले होते. या ठिकाणी जन्म-मृत्यूचे दाखले, कर भरण्याची सुविधा, बांधकाम मंजुरी, नाहरकत प्रमाणपत्र व महापालिकेशी संबंधित दाखले मिळत होते. मात्र काही महिन्यातच हा उपक्रम बंद पडला. अडचणी दूर करून हा उपक्रम पुन्हा सुरू करावा अशी नागरिकांची मागणी परंतु प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका