शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाने जलकुंभासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:29 IST

नागपूर महापालिकेने मौजा हुडकेश्वर येथे जलकुंभ बांधण्यासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली असून, जलकुंभाच्या पायासाठी काही लाख रुपये निधीही खर्च केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाने मागितले स्पष्टीकरण जबाबदार अधिकाऱ्यांची नावे सांगण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने मौजा हुडकेश्वर येथे जलकुंभ बांधण्यासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली असून, जलकुंभाच्या पायासाठी काही लाख रुपये निधीही खर्च केला आहे. जलकुंभाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्यामुळे ही बाब प्रकाशात आली.उच्च न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीरतेने घेतली आहे. मालकीहक्क नसल्याचे माहीत असतानाही मनपाने जलकुंभ बांधण्यासाठी वादातीत जमीन कशी निवडली, अशी विचारणा न्यायालयाने करून यावर ९ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश मनपाला दिला आहे. तसेच, या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी व नगरसेवक यांच्या नावांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यास सांगितले आहे. जलकुंभाच्या पायावर झालेला खर्च आणि जमीन मालकांचे झालेले नुकसान लक्षात घेता, संबंधित रक्कम अधिकाऱ्यांच्या वेतनातून किंवा मनपाच्या निधीतून का वसूल करण्यात येऊ नये यावरही भूमिका स्पष्ट करण्यात यावी, असे निर्देश मनपाला देण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली.वादातीत जमिनीवर जलकुंभ उभारण्याविरुद्ध कृपा सागर सहकारी गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहमान अब्दुल जब्बार, जमीन मालक रजनी महाडिक व समीर महाडिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत मूलभूत विकास समितीचे सदस्य प्रकाश टेंभुर्णे यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. याचिकाकर्त्यांनी मौजा हुडकेश्वर (सर्वे नं. २०) येथे ले-आऊट टाकून त्यातील एकूण १७९ भूखंड वेगवेगळ्या व्यक्तींना विकले आहेत. यापैकी १७८ व १७९ क्रमांकाचे भूखंड सार्वजनिक उपयोगासाठी राखीव होते. ते भूखंड याचिकाकर्ते रजनी महाडिक व समीर महाडिक यांना अवैधरीत्या विकण्यात आले. या भूखंडांवर जलकुंभाऐवजी उद्यान विकसित करावे, असे मध्यस्थांचे म्हणणे आहे. मनपाने याच दोन भूखंडांवर जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. डी. व्ही. सिरास तर, मध्यस्थांतर्फे अ‍ॅड. विकास कुलसंगे यांनी कामकाज पाहिले.

अंतरिम आदेशामुळे बांधकाम थांबले१४ डिसेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने मनपाला नोटीस बजावून या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला होता. त्यामुळे जलकुंभाचे बांधकाम थांबविण्यात आले. परंतु, तेव्हापर्यंत जलकुंभाच्या पायावर मनपाचे काही लाख रुपये खर्च झाले होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका