शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नागपूर मनपाने जलकुंभासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:29 IST

नागपूर महापालिकेने मौजा हुडकेश्वर येथे जलकुंभ बांधण्यासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली असून, जलकुंभाच्या पायासाठी काही लाख रुपये निधीही खर्च केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाने मागितले स्पष्टीकरण जबाबदार अधिकाऱ्यांची नावे सांगण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने मौजा हुडकेश्वर येथे जलकुंभ बांधण्यासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली असून, जलकुंभाच्या पायासाठी काही लाख रुपये निधीही खर्च केला आहे. जलकुंभाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्यामुळे ही बाब प्रकाशात आली.उच्च न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीरतेने घेतली आहे. मालकीहक्क नसल्याचे माहीत असतानाही मनपाने जलकुंभ बांधण्यासाठी वादातीत जमीन कशी निवडली, अशी विचारणा न्यायालयाने करून यावर ९ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश मनपाला दिला आहे. तसेच, या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी व नगरसेवक यांच्या नावांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यास सांगितले आहे. जलकुंभाच्या पायावर झालेला खर्च आणि जमीन मालकांचे झालेले नुकसान लक्षात घेता, संबंधित रक्कम अधिकाऱ्यांच्या वेतनातून किंवा मनपाच्या निधीतून का वसूल करण्यात येऊ नये यावरही भूमिका स्पष्ट करण्यात यावी, असे निर्देश मनपाला देण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली.वादातीत जमिनीवर जलकुंभ उभारण्याविरुद्ध कृपा सागर सहकारी गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहमान अब्दुल जब्बार, जमीन मालक रजनी महाडिक व समीर महाडिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत मूलभूत विकास समितीचे सदस्य प्रकाश टेंभुर्णे यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. याचिकाकर्त्यांनी मौजा हुडकेश्वर (सर्वे नं. २०) येथे ले-आऊट टाकून त्यातील एकूण १७९ भूखंड वेगवेगळ्या व्यक्तींना विकले आहेत. यापैकी १७८ व १७९ क्रमांकाचे भूखंड सार्वजनिक उपयोगासाठी राखीव होते. ते भूखंड याचिकाकर्ते रजनी महाडिक व समीर महाडिक यांना अवैधरीत्या विकण्यात आले. या भूखंडांवर जलकुंभाऐवजी उद्यान विकसित करावे, असे मध्यस्थांचे म्हणणे आहे. मनपाने याच दोन भूखंडांवर जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. डी. व्ही. सिरास तर, मध्यस्थांतर्फे अ‍ॅड. विकास कुलसंगे यांनी कामकाज पाहिले.

अंतरिम आदेशामुळे बांधकाम थांबले१४ डिसेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने मनपाला नोटीस बजावून या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला होता. त्यामुळे जलकुंभाचे बांधकाम थांबविण्यात आले. परंतु, तेव्हापर्यंत जलकुंभाच्या पायावर मनपाचे काही लाख रुपये खर्च झाले होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका