शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाकडून आकडेवारीत अनोखे ‘मॅजिक’; ‘त्या’ १५०० मृत्यूची नोंद कुठे गेली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 10:31 IST

मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती.

ठळक मुद्देघोळ इथला संपत नाही मृत्यूच्या आकड्यांमध्ये विसंगत माहिती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती. मनपातर्फे या कालावधीत शहरात झालेल्या मृत्यूच्या माहितीसंदर्भातदेखील असाच घोळ केला आहे. वेगवेगळ्या माहिती अधिकारात एकाच कालावधीत मृत्यू पावलेल्यांची विसंगत आकडेवारी मनपातर्फे देण्यात आली आहे. २०१८ साली प्राप्त झालेल्या माहितीच्या तुलनेत २०२० साली संबंधित कालावधीबाबत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मृत्यूच्या संख्येत तब्बल १५०० हून अधिक फरक दिसून येत आहे. विशेष म्हणजे जुन्या आकडेवारीच्या तुलनेत नवीन आकडेवारीत एकाच कालावधीतील मृत्यू घटल्याचे दाखविण्यात आले आहे. अशा स्थितीत त्या १५०० मृत्यूंची नोंद कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीत होणाऱ्या मृत्यूची नोंद ठेवणे व आवश्यक तेव्हा दाखले उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मनपाकडून यासंदर्भात पारदर्शक कारभाराचे दावे करण्यात येत असले तरी मृत्यू नोंदींसंदर्भातील दोन माहिती अधिकारांनी मनपाची पोलखोल केली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१५ ते २०१९ या वर्षांत झालेल्या महिला व पुरुषांच्या मृत्यू आकडेवारीसंदर्भात विचारणा केली होती. मनपातर्फे ३ फेब्रुवारी २०२० रोजी अर्जावर उत्तर देण्यात आले. यानुसार या तीन वर्षांच्या कालावधीत नागपुरात ७८ हजार ३२७ मृत्यू झाले. यात ४६ हजार ८७८ पुरुष व ३१ हजार ४४९ महिलांचा समावेश होता. २०१५ मध्ये १४ हजार ८९९ पुरुष तर १० हजार १७८ महिला, २०१६ मध्ये १६ हजार ००८ पुरुष तर १० हजार ४३० महिला आणि २०१७ मध्ये १५ हजार ९७१ पुरुष व १० हजार ८४१ महिलांच्या मृत्यूची नोंद झाली.दरम्यान ‘लोकमत’कडे याच मुद्द्यांसंदर्भातील माहिती अधिकाराच्या अर्जावर २० फेब्रुवारी २०१८ रोजी मनपाने दिलेली आकडेवारीदेखील आहे. याच्याशी तुलना केली असता मनपाने आकडेवारीत केलेला गोलमाल लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या या आकडेवारीनुसार नागपुरात २०१५ ते २०१७ याच कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले. त्यात ४८ हजार १८२ पुरुष व ३१ हजार ७४४ महिलांचा समावेश होता.दोन्ही माहिती अधिकारातील आकडेवारीची तपासणी केली असता नव्या माहितीमध्ये चक्क जुन्या माहितीच्या तुलनेत मृत्यूची संख्या १ हजार ५९९ ने कमी दाखविण्यात आली आहे. जर २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१७ या कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले होते, तर २०२० च्या माहितीनुसार याच काळातील मृत्यूची संख्या ७८ हजार ३२७ कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका