शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपूर मनपाकडून आकडेवारीत अनोखे ‘मॅजिक’; ‘त्या’ १५०० मृत्यूची नोंद कुठे गेली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 10:31 IST

मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती.

ठळक मुद्देघोळ इथला संपत नाही मृत्यूच्या आकड्यांमध्ये विसंगत माहिती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती. मनपातर्फे या कालावधीत शहरात झालेल्या मृत्यूच्या माहितीसंदर्भातदेखील असाच घोळ केला आहे. वेगवेगळ्या माहिती अधिकारात एकाच कालावधीत मृत्यू पावलेल्यांची विसंगत आकडेवारी मनपातर्फे देण्यात आली आहे. २०१८ साली प्राप्त झालेल्या माहितीच्या तुलनेत २०२० साली संबंधित कालावधीबाबत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मृत्यूच्या संख्येत तब्बल १५०० हून अधिक फरक दिसून येत आहे. विशेष म्हणजे जुन्या आकडेवारीच्या तुलनेत नवीन आकडेवारीत एकाच कालावधीतील मृत्यू घटल्याचे दाखविण्यात आले आहे. अशा स्थितीत त्या १५०० मृत्यूंची नोंद कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीत होणाऱ्या मृत्यूची नोंद ठेवणे व आवश्यक तेव्हा दाखले उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मनपाकडून यासंदर्भात पारदर्शक कारभाराचे दावे करण्यात येत असले तरी मृत्यू नोंदींसंदर्भातील दोन माहिती अधिकारांनी मनपाची पोलखोल केली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१५ ते २०१९ या वर्षांत झालेल्या महिला व पुरुषांच्या मृत्यू आकडेवारीसंदर्भात विचारणा केली होती. मनपातर्फे ३ फेब्रुवारी २०२० रोजी अर्जावर उत्तर देण्यात आले. यानुसार या तीन वर्षांच्या कालावधीत नागपुरात ७८ हजार ३२७ मृत्यू झाले. यात ४६ हजार ८७८ पुरुष व ३१ हजार ४४९ महिलांचा समावेश होता. २०१५ मध्ये १४ हजार ८९९ पुरुष तर १० हजार १७८ महिला, २०१६ मध्ये १६ हजार ००८ पुरुष तर १० हजार ४३० महिला आणि २०१७ मध्ये १५ हजार ९७१ पुरुष व १० हजार ८४१ महिलांच्या मृत्यूची नोंद झाली.दरम्यान ‘लोकमत’कडे याच मुद्द्यांसंदर्भातील माहिती अधिकाराच्या अर्जावर २० फेब्रुवारी २०१८ रोजी मनपाने दिलेली आकडेवारीदेखील आहे. याच्याशी तुलना केली असता मनपाने आकडेवारीत केलेला गोलमाल लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या या आकडेवारीनुसार नागपुरात २०१५ ते २०१७ याच कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले. त्यात ४८ हजार १८२ पुरुष व ३१ हजार ७४४ महिलांचा समावेश होता.दोन्ही माहिती अधिकारातील आकडेवारीची तपासणी केली असता नव्या माहितीमध्ये चक्क जुन्या माहितीच्या तुलनेत मृत्यूची संख्या १ हजार ५९९ ने कमी दाखविण्यात आली आहे. जर २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१७ या कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले होते, तर २०२० च्या माहितीनुसार याच काळातील मृत्यूची संख्या ७८ हजार ३२७ कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका