शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाकडून आकडेवारीत अनोखे ‘मॅजिक’; ‘त्या’ १५०० मृत्यूची नोंद कुठे गेली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 10:31 IST

मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती.

ठळक मुद्देघोळ इथला संपत नाही मृत्यूच्या आकड्यांमध्ये विसंगत माहिती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती. मनपातर्फे या कालावधीत शहरात झालेल्या मृत्यूच्या माहितीसंदर्भातदेखील असाच घोळ केला आहे. वेगवेगळ्या माहिती अधिकारात एकाच कालावधीत मृत्यू पावलेल्यांची विसंगत आकडेवारी मनपातर्फे देण्यात आली आहे. २०१८ साली प्राप्त झालेल्या माहितीच्या तुलनेत २०२० साली संबंधित कालावधीबाबत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मृत्यूच्या संख्येत तब्बल १५०० हून अधिक फरक दिसून येत आहे. विशेष म्हणजे जुन्या आकडेवारीच्या तुलनेत नवीन आकडेवारीत एकाच कालावधीतील मृत्यू घटल्याचे दाखविण्यात आले आहे. अशा स्थितीत त्या १५०० मृत्यूंची नोंद कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीत होणाऱ्या मृत्यूची नोंद ठेवणे व आवश्यक तेव्हा दाखले उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मनपाकडून यासंदर्भात पारदर्शक कारभाराचे दावे करण्यात येत असले तरी मृत्यू नोंदींसंदर्भातील दोन माहिती अधिकारांनी मनपाची पोलखोल केली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१५ ते २०१९ या वर्षांत झालेल्या महिला व पुरुषांच्या मृत्यू आकडेवारीसंदर्भात विचारणा केली होती. मनपातर्फे ३ फेब्रुवारी २०२० रोजी अर्जावर उत्तर देण्यात आले. यानुसार या तीन वर्षांच्या कालावधीत नागपुरात ७८ हजार ३२७ मृत्यू झाले. यात ४६ हजार ८७८ पुरुष व ३१ हजार ४४९ महिलांचा समावेश होता. २०१५ मध्ये १४ हजार ८९९ पुरुष तर १० हजार १७८ महिला, २०१६ मध्ये १६ हजार ००८ पुरुष तर १० हजार ४३० महिला आणि २०१७ मध्ये १५ हजार ९७१ पुरुष व १० हजार ८४१ महिलांच्या मृत्यूची नोंद झाली.दरम्यान ‘लोकमत’कडे याच मुद्द्यांसंदर्भातील माहिती अधिकाराच्या अर्जावर २० फेब्रुवारी २०१८ रोजी मनपाने दिलेली आकडेवारीदेखील आहे. याच्याशी तुलना केली असता मनपाने आकडेवारीत केलेला गोलमाल लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या या आकडेवारीनुसार नागपुरात २०१५ ते २०१७ याच कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले. त्यात ४८ हजार १८२ पुरुष व ३१ हजार ७४४ महिलांचा समावेश होता.दोन्ही माहिती अधिकारातील आकडेवारीची तपासणी केली असता नव्या माहितीमध्ये चक्क जुन्या माहितीच्या तुलनेत मृत्यूची संख्या १ हजार ५९९ ने कमी दाखविण्यात आली आहे. जर २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१७ या कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले होते, तर २०२० च्या माहितीनुसार याच काळातील मृत्यूची संख्या ७८ हजार ३२७ कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका