शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर मनपा कंत्राटदार आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:07 IST

महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे विकास कामे थांबली आहेत. कोरोना संकटामुळे महसूलही घटला असल्याने मार्च महिन्यापासून देयके मिळाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जुनीच देणी मिळाली नसल्याने नवीन कामे कशी सुरू करायची, अशा चिंतेत कंत्राटदार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे विकास कामे थांबली आहेत. कोरोना संकटामुळे महसूलही घटला असल्याने मार्च महिन्यापासून देयके मिळाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जुनीच देणी मिळाली नसल्याने नवीन कामे कशी सुरू करायची, अशा चिंतेत कंत्राटदार आहेत.मनपात जवळपास ३०० कंत्राटदार आहेत. २०१९- २०२० या वर्षातील देयके अजूनही मनपा प्रशासनाने अदा केलेली नाहीत. १७५ ते २०० कोटीची ही देयके आहेत. काही देयके वर्षभरापासून प्रलंबित आहेत. देयके न मिळाल्याने मजुरांना देण्यासाठी पैसे नाहीत. त्यात कोरोनामुळे परप्रांतीय मजूर गावाला गेले. तर काही नागपुरातच थांबले. काम बंद असले तरी त्यांना उदरनिर्वाहासाठी पैसे द्यावे लागतात. देयके प्रलंबित असल्याने मजुरांना पैसे कसे द्यावेत, असा गंभीर प्रश्न कंत्राटदारांपुढे ठाकला आहे. मार्च महिन्यात वर्षभरातील थकीत देयके मिळत होती.परंतु यावर्षी मार्च संपला तरी देयके मिळालेली नाहीत. देयके प्रलंबित राहत असल्याने काही कंत्राटदारांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून देयके मिळत नसतील तर आम्ही आत्महत्या करायची का, असा सवाल केला आहे. देयके वेळेवर मिळत नसल्याने लहान कंत्राटदारांपुढे गंभीर समस्या उभी ठाकली आहे.अधिकाऱ्यांच्या टेबलवर फायलींचे ढिगारेमागील वर्षातील देयके प्रलंबित तर आहेतच. त्यात जानेवारी महिन्यापासून बिले मिळालेली नाहीत. वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर प्रलंबित फायलींचे ढीग लागले आहेत. पंचवीस टेबल फिरून फाईल वित्त अधिकाऱ्याकडे जाते. त्यानंतरही टेबलवर पडून राहते. त्यात त्रुटी काढल्या जातात. हा प्रकार थांबावा, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.वित्तीय मंजुरी न घेताच कामेमुख्यमंत्री निधीतून १५७ कोटीची शहराच्या विविध भागात कामे करण्यात आली. परंतु वित्तीय मंजुरी न घेताच कार्यादेश काढण्यात आले. कामे केल्यानंतर बिलाची मागणी केली असता यातील अनेक कामांना वित्तीय मंजुरी नसल्याचा प्रकार पुढे आला. मंजुरी नसताना कामे केल्याने देयके कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.महापालिकेतील अडीशे-तीनशे कंत्राटदारांची सुमारे १७५ कोटींची बिले मार्च महिन्यापासून मिळालेली नाहीत. यामुळे कंत्राटदार संकटात आहेत. मजुरांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत नवीन कामे कशी करावी.विजय नायडू, अध्यक्ष, मनपा कंत्राटदार संघटना

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका