शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नागपूर मनपा संकटात; मंजूर १५७ कोटी, दमडीही हाती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 11:32 IST

Nagpur News Nagpur Municipal Corporation सरकार बदलल्यानंतर मनपाला अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे नागपूर मनपा मोठ्या आर्थिक संकटात आली आहे.

ठळक मुद्दे१३ कोटी रुपयांची कामे झाली पूर्ण

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : राज्याच्या मागील सरकारने नागपूरच्या विकास कार्यासाठी मुख्यमंत्री फंडातून १५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. नागपूर मनपाला संबंधित निधीतून विकास कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मनपानेही तत्परता दाखवीत १५७ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. ८७ कार्यासाठी १४८ कोटी रुपयांच्या निविदा कंत्राटदारांनी भरल्या. कंत्राटदारांनी १० ते १५ टक्के खाली जाऊन निविदा भरल्या; पण विशेष बाब अशी की, सरकार बदलल्यानंतर संबंधित निधीपैकी मनपाला अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे नागपूर मनपा मोठ्या आर्थिक संकटात आली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी नागपूर शहरात विविध विकास कामांसाठी संबंधित राशीचे नियोजन करून रस्त्याची दुरुस्ती, नवीन सिमेंट रोड, अंतर्गत रस्ते आदींच्या ८७ कामांची यादी तयार करण्यात आली. यापैकी ८५ कामांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले. यापैकी २२ कामे पूर्ण झाली आहेत. २४ कामे सुरू आहेत, तर ३९ कामे अपूर्ण आहेत. जेवढी कामे झाली आहेत, त्यांची बिले कंत्राटदारांनी मनपा वित्त विभागाकडे सोपविली आहेत; परंतु वित्त विभागाने यापैकी एकाही बिलाला हात लावला नाही. कारण संबंधित मदत राशीपैकी एक रुपयाही मनपाला मिळालेला नाही.

वरिष्ठ अधिकारी म्हणाले, संबंधित राशीकरिता नागपूर मनपातर्फे अनेकदा राज्य शासनाला पत्र लिहिले आहे. या पत्रांवर अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही. आताही पाठपुरावा करण्यात येत आहे.

लहान कंत्राटदारांनी थांबविले काम

दहा लाखांपर्यंत काम केलेल्या कंत्राटदारांनी बिल न मिळाल्याने कामे बंद केली आहेत. त्यामुळे अनेक भागांतील अपूर्ण कामांमुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जेव्हा नगरसेवक संबंधित कंत्राटदारांकडे काम पूर्ण करण्याची गोष्ट करतात तेव्हा ते जुने बिल अजूनही न मिळाल्याची आठवण त्यांना करून देतात. सत्तारूढ पक्षांतर्फे आश्वासन मिळाल्यानंतर काही मोठ्या कंत्राटदारांनी काम सुरू ठेवल्याची माहिती आहे.

अशी आहे स्थिती :

- १५७ कोटी मंजूर, त्यापैकी एक रुपयाही मिळालेला नाही.

- मनपाने ८७ कामांच्या निविदा काढल्या, १४८ कोटींच्या निविदा भरण्यात आल्या.

- १३ कोटी रुपयांची २२ कामे पूर्ण झाली, ३९ कामे अपूर्ण.

- मनपाने आतापर्यंत एकाही बिलावर निर्णय घेतलेला नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका