शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपूर पावसाळी अधिवेशन; खासगी टॅक्सी कंपनीवर कृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 10:53 IST

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यावेळी ४ जुलैपासून नागपुरात होत आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खासगी टॅक्सी कंपनीकडून सेवा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्दे२०० गाड्या लागणार दररोज ३ लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यावेळी ४ जुलैपासून नागपुरात होत आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खासगी टॅक्सी कंपनीकडून सेवा घेतली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या पदानुसार प्रशासन त्यांच्यासाठी लहान-मोठ्या २०० गाड्यांची व्यवस्था करण्याच्या कामी लागले आहे. एका लहान कारवर दररोज १२०० रुपये खर्च येईल. एकूणच टॅक्सी सेवेवर दररोज सुमारे ३ लाखांचा खर्च होणार आहे.प्रशासनाचे म्हणणे आहे की, गेल्या हिवाळी अधिवेशनात १०५५ वाहन नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक विभागातून विविध शासकीय विभागांकडून अधिग्रहित करण्यात आले होते. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व पूर परिस्थितीचा धोका पाहता विविध जिल्ह्यांतून वाहने मागविणे शक्य नाही. त्या वाहनांची गरज तेथेच भासणार आहे. त्यामुळे गरजेनुसार वाहन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी चर्चा करताना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी खासगी वाहन सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीकडून भाड्याने वाहने घेतली जातील, असे सांगितले होते. त्यानुसार ई-निविदा जारी केली जाईल. उपायुक्त सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन तीन दिवसात निर्णय घेईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खासगी कंपनीकडून सेवा घेतली जाईल. यासाठी कराराचे प्रारुप आरटीओ स्तरावर तयार केला जाईल. एका वाहनावर दररोज सुमारे १२०० रुपये खर्च होतील व यात लक्झरी वाहन सेवेचा खर्च समाविष्ट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.सूत्रांच्या मते खासगी वाहन सेवा उपलब्ध करून देणाऱ्यांकडून लक्झरी वाहने देखील मागविले जातील. याचा खर्च निविदेनंतर निश्चित केला जाईल. या संदर्भात लोकमतने विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त के.एन.के राव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वाहनांची सेवा घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यावर किती खर्च येईल हे निश्चित नसल्याचे सांगितले. यावर चर्चा सुरू असल्याचे कारण त्यांनी दिले. निविदा प्रक्रियेबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

पावसाचे फक्त निमित्तविभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पावसाचे कारण समोर करीत खासगी वाहन कंपनीकडून सेवा घेण्याचे सूतोवाच केले आहे. वास्तविकता शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, तंत्र शिक्षण विभाग, शासकीय महाविद्यालय, विद्यापीठास,ह असे अनेक विभाग आहेत की जेथे अधिकाऱ्यांना वाहनांची सुविधा देण्यात आली आहे. हिवाळी व पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्याकडून वाहने मागविली जातात. कारण, पावसाळ्यात त्यांना कुठल्याही दौऱ्यावर जाण्याची गरज पडत नाही. याशिवाय असे बरेच शासकीय विभाग आहेत की ज्यांच्याकडून वाहन मागविली जाऊ शकतात.

टॅग्स :Governmentसरकार