शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Nagpur: अतिवृष्टीपासून ट्रॅकला वाचविण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना, पुराचा धोका टाळण्यासाठी आवश्यक कामे सुरू

By नरेश डोंगरे | Updated: May 19, 2024 20:35 IST

Nagpur: अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला गेल्या वर्षी बसलेला फटका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा मान्सून पूर्वीच पूराचा धोका टाळणाऱ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी, २३ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर रेल्वे यार्डमधील सर्व ट्रॅक पाण्याखाली आले होते.

- नरेश डोंगरे नागपूर - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला गेल्या वर्षी बसलेला फटका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा मान्सून पूर्वीच पूराचा धोका टाळणाऱ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी, २३ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर रेल्वे यार्डमधील सर्व ट्रॅक पाण्याखाली आले होते. पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नागपूर मार्गे धावणारी रेल्वे वाहतूक ठप्पा झाली होती.

अकोला जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यातही वेगवेगळ्या वेळी काहीशी अशीच स्थिती निर्माण झाल्याने त्या त्या मार्गावरच्या अनेक रेल्वेगाड्यांना फटका बसला होता. परिणामी रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला होता. या संबंधाने प्रचंड ओरड झाली होती आणि थेट दिल्लीपर्यंत तक्रारीही झाल्या होत्या. ते सर्व लक्षात घेऊन यावेळी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने अतिवृष्टीमुळे रेल्वे गाड्यांच्या संचालनावर परिणाम होऊ नये याची आतापासूनच काळजी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत रेल्वे रुग्णालय, नागपूरच्या मागे असलेल्या पुलाच्या बॅरल आणि नाल्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. ११५ मीटर लांबीच्या पुलाच्या बॅरलच्या साफसफाईच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील साफसफाईचे काम सुरू केले जाणार असून त्यासाठी महापालिका प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. यातून पुलाच्या वरच्या भागातील नाल्याचीही सफाई केली जाणार आहे.

पुलाच्या बॅरल आणि नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या साफसफाईमुळे अतिवृष्टीदरम्यान पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे पुराचा संभाव्य धोका टाळला जाणार आहे. नागपूर रेल्वे यार्डला पुरापासून मुक्त ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच केल्या जात आहे. याव्यतिरिक्त, नदीच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही काठावरील नाल्याला लागून असलेल्या भागांना देखील पुराचा धोका कमी होणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर