शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

Nagpur: अतिवृष्टीपासून ट्रॅकला वाचविण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना, पुराचा धोका टाळण्यासाठी आवश्यक कामे सुरू

By नरेश डोंगरे | Updated: May 19, 2024 20:35 IST

Nagpur: अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला गेल्या वर्षी बसलेला फटका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा मान्सून पूर्वीच पूराचा धोका टाळणाऱ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी, २३ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर रेल्वे यार्डमधील सर्व ट्रॅक पाण्याखाली आले होते.

- नरेश डोंगरे नागपूर - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला गेल्या वर्षी बसलेला फटका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा मान्सून पूर्वीच पूराचा धोका टाळणाऱ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी, २३ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर रेल्वे यार्डमधील सर्व ट्रॅक पाण्याखाली आले होते. पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नागपूर मार्गे धावणारी रेल्वे वाहतूक ठप्पा झाली होती.

अकोला जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यातही वेगवेगळ्या वेळी काहीशी अशीच स्थिती निर्माण झाल्याने त्या त्या मार्गावरच्या अनेक रेल्वेगाड्यांना फटका बसला होता. परिणामी रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला होता. या संबंधाने प्रचंड ओरड झाली होती आणि थेट दिल्लीपर्यंत तक्रारीही झाल्या होत्या. ते सर्व लक्षात घेऊन यावेळी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने अतिवृष्टीमुळे रेल्वे गाड्यांच्या संचालनावर परिणाम होऊ नये याची आतापासूनच काळजी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत रेल्वे रुग्णालय, नागपूरच्या मागे असलेल्या पुलाच्या बॅरल आणि नाल्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. ११५ मीटर लांबीच्या पुलाच्या बॅरलच्या साफसफाईच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील साफसफाईचे काम सुरू केले जाणार असून त्यासाठी महापालिका प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. यातून पुलाच्या वरच्या भागातील नाल्याचीही सफाई केली जाणार आहे.

पुलाच्या बॅरल आणि नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या साफसफाईमुळे अतिवृष्टीदरम्यान पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे पुराचा संभाव्य धोका टाळला जाणार आहे. नागपूर रेल्वे यार्डला पुरापासून मुक्त ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच केल्या जात आहे. याव्यतिरिक्त, नदीच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही काठावरील नाल्याला लागून असलेल्या भागांना देखील पुराचा धोका कमी होणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर