शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या विधी विद्यापीठात विद्यार्थिनींशी वाईट वर्तणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:15 IST

एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या  बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्राद्वारे विद्यापीठाला याची माहिती दिली असून, येथे असलेला शिस्तीचा अभाव व विद्यार्थिनींसोबत असलेल्या वाईट वर्तणुकीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनीने सोडले विद्यापीठविद्यार्थिनींमध्ये असंतोष

आॅनलाईन नागपूरनागपूर : एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या  बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्राद्वारे विद्यापीठाला याची माहिती दिली असून, येथे असलेला शिस्तीचा अभाव व विद्यार्थिनींसोबत असलेल्या वाईट वर्तणुकीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे.संबंधित विद्यार्थिनीने ‘क्लॅट’ ही परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात तिने विद्यापीठ सोडले. यानंतर तिच्या वडिलांनी प्रशासनाला पत्र लिहून तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व ‘टीसी’ जारी करण्याची मागणी केली.प्रवेशाच्या चार महिन्यानंतर तिने प्रवेश रद्द केला असल्यामुळे काही रक्कम कापून १ लाख १३ हजार रुपये परत करण्यात आले आहे. तसेच बारावीची गुणपत्रिका आणि ‘टीसी’ यांच्यासह इतर मूळ कागदपत्रेदेखील वापस करण्यात आली. नियमानुसार एकदा प्रवेश झाल्यानंतर प्रवेश शुल्क व जुन्या महाविद्यालयाची ‘टीसी’ परत करता येत नाही. विद्यार्थी उत्तीर्ण आहे की अनुत्तीर्ण, असा उल्लेख करून विद्यापीठातर्फे नवीन ‘टीसी’ जारी करण्यात येते.कुलसचिवांचे मौनयासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने मौन साधले आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने विद्यापीठात जाऊन माहिती घेतली असता, कुलसचिव डॉ. एन. एम. साकरकर तेथे नव्हते. दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला व मंगळवारी येण्याबद्दल सांगितले.पोलीस तक्रार का नाही?या प्रकरणात पोलीस तक्रार न झाल्यामुळे आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. जर प्रकरण इतके गंभीर आहे, तर त्याची पोलीस तक्रार का करण्यात आली नाही? केवळ पत्र लिहून प्रवेश रद्द करा करण्यात आला? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. या प्रकरणात न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Molestationविनयभंगuniversityविद्यापीठ