शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नागपूरच्या विधी विद्यापीठात विद्यार्थिनींशी वाईट वर्तणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:15 IST

एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या  बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्राद्वारे विद्यापीठाला याची माहिती दिली असून, येथे असलेला शिस्तीचा अभाव व विद्यार्थिनींसोबत असलेल्या वाईट वर्तणुकीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनीने सोडले विद्यापीठविद्यार्थिनींमध्ये असंतोष

आॅनलाईन नागपूरनागपूर : एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या  बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्राद्वारे विद्यापीठाला याची माहिती दिली असून, येथे असलेला शिस्तीचा अभाव व विद्यार्थिनींसोबत असलेल्या वाईट वर्तणुकीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे.संबंधित विद्यार्थिनीने ‘क्लॅट’ ही परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात तिने विद्यापीठ सोडले. यानंतर तिच्या वडिलांनी प्रशासनाला पत्र लिहून तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व ‘टीसी’ जारी करण्याची मागणी केली.प्रवेशाच्या चार महिन्यानंतर तिने प्रवेश रद्द केला असल्यामुळे काही रक्कम कापून १ लाख १३ हजार रुपये परत करण्यात आले आहे. तसेच बारावीची गुणपत्रिका आणि ‘टीसी’ यांच्यासह इतर मूळ कागदपत्रेदेखील वापस करण्यात आली. नियमानुसार एकदा प्रवेश झाल्यानंतर प्रवेश शुल्क व जुन्या महाविद्यालयाची ‘टीसी’ परत करता येत नाही. विद्यार्थी उत्तीर्ण आहे की अनुत्तीर्ण, असा उल्लेख करून विद्यापीठातर्फे नवीन ‘टीसी’ जारी करण्यात येते.कुलसचिवांचे मौनयासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने मौन साधले आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने विद्यापीठात जाऊन माहिती घेतली असता, कुलसचिव डॉ. एन. एम. साकरकर तेथे नव्हते. दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला व मंगळवारी येण्याबद्दल सांगितले.पोलीस तक्रार का नाही?या प्रकरणात पोलीस तक्रार न झाल्यामुळे आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. जर प्रकरण इतके गंभीर आहे, तर त्याची पोलीस तक्रार का करण्यात आली नाही? केवळ पत्र लिहून प्रवेश रद्द करा करण्यात आला? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. या प्रकरणात न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Molestationविनयभंगuniversityविद्यापीठ