शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

नागपूरच्या विधी विद्यापीठात विद्यार्थिनींशी वाईट वर्तणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:15 IST

एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या  बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्राद्वारे विद्यापीठाला याची माहिती दिली असून, येथे असलेला शिस्तीचा अभाव व विद्यार्थिनींसोबत असलेल्या वाईट वर्तणुकीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनीने सोडले विद्यापीठविद्यार्थिनींमध्ये असंतोष

आॅनलाईन नागपूरनागपूर : एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या  बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्राद्वारे विद्यापीठाला याची माहिती दिली असून, येथे असलेला शिस्तीचा अभाव व विद्यार्थिनींसोबत असलेल्या वाईट वर्तणुकीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे.संबंधित विद्यार्थिनीने ‘क्लॅट’ ही परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात तिने विद्यापीठ सोडले. यानंतर तिच्या वडिलांनी प्रशासनाला पत्र लिहून तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व ‘टीसी’ जारी करण्याची मागणी केली.प्रवेशाच्या चार महिन्यानंतर तिने प्रवेश रद्द केला असल्यामुळे काही रक्कम कापून १ लाख १३ हजार रुपये परत करण्यात आले आहे. तसेच बारावीची गुणपत्रिका आणि ‘टीसी’ यांच्यासह इतर मूळ कागदपत्रेदेखील वापस करण्यात आली. नियमानुसार एकदा प्रवेश झाल्यानंतर प्रवेश शुल्क व जुन्या महाविद्यालयाची ‘टीसी’ परत करता येत नाही. विद्यार्थी उत्तीर्ण आहे की अनुत्तीर्ण, असा उल्लेख करून विद्यापीठातर्फे नवीन ‘टीसी’ जारी करण्यात येते.कुलसचिवांचे मौनयासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने मौन साधले आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने विद्यापीठात जाऊन माहिती घेतली असता, कुलसचिव डॉ. एन. एम. साकरकर तेथे नव्हते. दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला व मंगळवारी येण्याबद्दल सांगितले.पोलीस तक्रार का नाही?या प्रकरणात पोलीस तक्रार न झाल्यामुळे आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. जर प्रकरण इतके गंभीर आहे, तर त्याची पोलीस तक्रार का करण्यात आली नाही? केवळ पत्र लिहून प्रवेश रद्द करा करण्यात आला? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. या प्रकरणात न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Molestationविनयभंगuniversityविद्यापीठ