शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

जी-२० परिषदेसाठी सजतेय उपराजधानी; सौंदर्यीकरणाच्या कामाचे होतेय कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2023 21:29 IST

Nagpur News सध्या नागपुरात मोठ्या प्रमाणावर सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. मुख्य मार्गावरील भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटली जात आहेत. चौकाचौकांचा मेकओव्हर सुरू आहे. जी-२० परिषदेसाठी हे सौंदर्यीकरण होत असल्याने ही परिषद नेमकी आहे तरी काय? याचीच सर्वत्र चर्चा आहे.

नागपूर : सध्या नागपुरात मोठ्या प्रमाणावर सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. मुख्य मार्गावरील भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटली जात आहेत. चौकाचौकांचा मेकओव्हर सुरू आहे. जी-२० परिषदेसाठी हे सौंदर्यीकरण होत असल्याने ही परिषद नेमकी आहे तरी काय? याचीच सर्वत्र चर्चा आहे.

जागतिक स्तरावरील जी-२० (ग्रुप ऑफ २०) शिखर परिषद आयोजित करण्याचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. जी-२० अंतर्गत नागरी समाज संस्थांचा अर्थात ‘सिव्हिल सोसायटी’ (सी-२०) या गटाची प्रारंभिक परिषद नागपूर येथे २१ व २२ मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहे. सी-२० परिषदेच्या माध्यमातून स्थानिक नागरी संस्थांना आपले कार्य-कर्तृत्व जगाच्या व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि देवाण-घेवाणीचे केंद्र म्हणून नागपूर शहराला सादर करण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. देश- विदेशातील पाहुण्यांच्या आदरातिथ्याची संधीही भारताचे हृदयस्थान असलेल्या नागपूर शहराला मिळाली आहे. नागपूर शहरात होणाऱ्या या जागतिक परिषदेबाबत जनसामान्यांमध्ये विशेष कुतूहल आहे.

- जी-२० काय आहे ?

जी-२० किंवा ग्रुप ऑफ २० हा १९ देश आणि युरोपियन युनियन या देशांचा एक आंतरराष्ट्रीय गट आहे. जी-२० गटाचे कुठेही मुख्यालय अथवा सचिवालय नाही. जी-२० ची शिखर परिषद ही चक्राकार पद्धतीने निवड झालेल्या सदस्य राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी त्या-त्या देशात आयोजित केली जाते. जी-२० हा गट व्यापार, गुंतवणूक, कर आणि आर्थिक धोरणांसह जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या विविध मुद्यांवर लक्ष केंद्रित करतो. यातून सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यात येते. जी-२० ने सुरुवातीला व्यापक आर्थिक मुद्यांवर लक्ष केंद्रित केले; परंतु कालांतराने या गटाने व्यापार, हवामान बदल, शाश्वत विकास, आरोग्य, कृषी, ऊर्जा, पर्यावरण आणि भ्रष्टाचारविरोध या मुद्यांचा समावेश करून कार्यविस्तार केला आहे.

- यंदाच्या जी-२० परिषदेचे घोषवाक्य

१ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारत जी-२० संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताच्या यजमानपदात आयोजित या परिषदेचे घोषवाक्य ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अर्थात ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे आहे. पृथ्वीतलावरील मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यासह संपूर्ण जीवसृष्टीचे महत्त्व आणि त्यांच्यातील परस्परसंबंधाचे महत्त्व या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आले आहे.

- जी-२० चे सदस्य देश

जी-२० समूहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया गणराज्य, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि युरोपियन संघ यांचा समावेश आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी