शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नागपूर सुधार प्रन्यास पुन्हा पुनरुज्जीवित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 21:24 IST

Nagpur Improvement Trust, Nagpur news राज्य सरकारने आ. विकास ठाकरे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी नियुक्ती करून नासुप्र पुनरुज्जीवित होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देभाजपच्या काळात बरखास्तीची घोषणा पण प्रक्रिया अपूर्ण विकास ठाकरे यांची विश्वस्तपदी नियुक्ती करून सरकारचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात एकच विकास प्राधिकरण असावे, या हेतूने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नागपूर सुधार प्रन्यास रद्द करून शहरातील नासुप्रच्या मालमत्ता व योजना मनपाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. मागच्या भाजप सरकारने व त्यावेळी नागपूरचे मुख्यमंत्री असल्याने विधानसभेत नासुप्र बरखास्तीची घोषणा केली होती. मात्र भाजप सरकारच्या काळात नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यानंतर राज्यातील सत्ता परिवर्तनासोबतच नासुप्रला पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्य सरकारने आ. विकास ठाकरे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी नियुक्ती करून नासुप्र पुनरुज्जीवित होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

युती सरकारच्या निर्णयानंतर नासुप्रकडील गुंठेवारी व उद्यान हे दोन विभाग मनपाकडे हस्तांतरित करण्यात आले. नासुप्रच्या मालकीच्या शहरातील मालमत्ता व लीजवरील भूखंड अजूनही त्यांच्याकडे कायम आहे. बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अजूनही नासुप्रचा कारभार सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नासुप्रच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

नासुप्रच्या विकास योजना एनएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. मात्र एनएमआरडीएत नासुप्रतील अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. राज्यात सत्ता असलेल्या पक्षाच्या आमदाराची नासुप्रवर विश्वस्त म्हणून नियुक्ती केली जाते. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात माजी आमदार दीनानाथ पडोळे यांची तर शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात माजी आमदार सुधाकर कोहळे यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता महाविकास आघाडी सरकारने विकास ठाकरे यांची विश्वस्तपदी नियुक्ती केली आहे.

गुंठेवारी विभाग नासुप्रकडे जाणार?

भूखंडधारकांना सुविधा व्हावी, यासाठी गुंठेवारी विभाग नासुप्रकडून मनपाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र नगर रचना विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने भूखंड नियमितीकरणाच्या कामाला दीड वर्षानंतरही गती मिळालेली नाही. अशा परिस्थितीत गुंठेवारी विभाग पुन्हा नासुप्रकडे हस्तांतरित करून नासुप्रला पुनरुज्जीवित करण्यात येणार असल्याची नासुप्रत चर्चा आहे.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासState Governmentराज्य सरकार