शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नागपूर सुधार प्रन्यास पुन्हा पुनरुज्जीवित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 21:24 IST

Nagpur Improvement Trust, Nagpur news राज्य सरकारने आ. विकास ठाकरे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी नियुक्ती करून नासुप्र पुनरुज्जीवित होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देभाजपच्या काळात बरखास्तीची घोषणा पण प्रक्रिया अपूर्ण विकास ठाकरे यांची विश्वस्तपदी नियुक्ती करून सरकारचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात एकच विकास प्राधिकरण असावे, या हेतूने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नागपूर सुधार प्रन्यास रद्द करून शहरातील नासुप्रच्या मालमत्ता व योजना मनपाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. मागच्या भाजप सरकारने व त्यावेळी नागपूरचे मुख्यमंत्री असल्याने विधानसभेत नासुप्र बरखास्तीची घोषणा केली होती. मात्र भाजप सरकारच्या काळात नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यानंतर राज्यातील सत्ता परिवर्तनासोबतच नासुप्रला पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्य सरकारने आ. विकास ठाकरे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी नियुक्ती करून नासुप्र पुनरुज्जीवित होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

युती सरकारच्या निर्णयानंतर नासुप्रकडील गुंठेवारी व उद्यान हे दोन विभाग मनपाकडे हस्तांतरित करण्यात आले. नासुप्रच्या मालकीच्या शहरातील मालमत्ता व लीजवरील भूखंड अजूनही त्यांच्याकडे कायम आहे. बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अजूनही नासुप्रचा कारभार सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नासुप्रच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

नासुप्रच्या विकास योजना एनएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. मात्र एनएमआरडीएत नासुप्रतील अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. राज्यात सत्ता असलेल्या पक्षाच्या आमदाराची नासुप्रवर विश्वस्त म्हणून नियुक्ती केली जाते. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात माजी आमदार दीनानाथ पडोळे यांची तर शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात माजी आमदार सुधाकर कोहळे यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता महाविकास आघाडी सरकारने विकास ठाकरे यांची विश्वस्तपदी नियुक्ती केली आहे.

गुंठेवारी विभाग नासुप्रकडे जाणार?

भूखंडधारकांना सुविधा व्हावी, यासाठी गुंठेवारी विभाग नासुप्रकडून मनपाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र नगर रचना विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने भूखंड नियमितीकरणाच्या कामाला दीड वर्षानंतरही गती मिळालेली नाही. अशा परिस्थितीत गुंठेवारी विभाग पुन्हा नासुप्रकडे हस्तांतरित करून नासुप्रला पुनरुज्जीवित करण्यात येणार असल्याची नासुप्रत चर्चा आहे.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासState Governmentराज्य सरकार