शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर हायकोर्टात ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:31 IST

अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तपासणी केली जाते.

ठळक मुद्देसुरक्षा व्यवस्था कडक : कसून केली जाते तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तपासणी केली जाते.उच्च न्यायालय सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक एच. एम. सय्यद यांनी मंगळवारी काही पत्रकारांशी बोलताना सुरक्षा व्यवस्थेतील सुधारणेची माहिती दिली. पूर्वी केवळ नाव नोंदवून प्रवेश दिला जात होता. त्यामुळे बरेच जण खोटी नावे सांगून आत जात होते. ही त्रुटी लक्षात आल्यानंतर आता केवळ ओळखपत्र पाहूनच आत प्रवेश दिला जातो. कुणासोबत बॅग व अन्य काही साहित्य असल्यास त्याची कसून तपासणी केली जाते. उच्च न्यायालय इमारत व परिसरातील हालचालींचा वेध घेण्यासाठी काही पोलिसांना साध्या वेशात वावरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलीस लोकांमध्ये मिसळून धोक्यांचा कानोसा घेत असतात.इमारतीबाहेरच्या परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सर्व कॅमेरे सुरू असून, त्यावर एक कर्मचारी बारीक लक्ष ठेवून असतो. महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता इतरांच्या वाहनांना परिसरात प्रवेश दिला जात नाही. उच्च न्यायालयाच्या सुरक्षेकरिता रोज किमान ५० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. इमारतीत प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्या प्रत्येक मार्गावर व इमारतीमध्येही ठिकठिकाणी पोलीस तैनात केले जातात, असे सय्यद यांनी सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर