शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

मनरेगात नागपूरने मारली बाजी

By admin | Updated: April 29, 2016 02:57 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) होय.

नागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) होय. या योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्याने भरीव काम करीत राज्यात बाजी मारली आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात १,४९,९८२ कुटुंबांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. १, ४५,७५७ कुटुंबांना जॉबकार्ड मिळाले असून ३३,८५१ कुटुंबाला प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक कामांमध्ये नागपूर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, हे विशेष. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नागपूर जिल्हा हा मजुरांच्या आधार जोडणीमध्ये राज्यात पहिल्या कमांकावर आहे. जिल्ह्यातील ९९.८० टक्के मजुरांचे आधार क्रमांक काढून नरेगा वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. मनुष्य दिवस निर्मितीमध्ये सुद्धा नागपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शासनाकडून १४.४५ दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने २४.५९ दिवस रोजगार उपलब्ध करून देत १७० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ९ टक्के, अनुसूचित जमातीसाठी २९ टक्के आणि महिलांना ४५ टक्के रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत १३६३ सिंचन विहिरी, १६३ पांदण रस्ते, ३७५ सिमेंट रस्ते, ९३,३०० वृक्ष लागवड आणि १५५० वैयक्तिक शौचालयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. २०१५-१६ मध्ये सिंचन विहिरींची ७०० कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात १५९९ कामांना सुरुवात झाली. १५ कोटी २३ लाख ९ हजार रुपये खर्च करण्यात आले. २०१५-१६ पूर्वी सुरु करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामापैकी ३७९ कामे या वर्षी पूर्ण करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत व्यतिरिक्त इतर यंत्रणा उदाहरणार्थ जलसंधारण विभाग, कृषी विभाग इत्यादींना सिंचन विहिरींच्या कामे सोपविण्यात आली हाती. २०१५-१६ मध्ये १६३ पांदण रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून ही सर्व कामे २०१६ च्या पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येतील. सिमेंट रस्त्यांची ३७५ कामे हाती घेऊन ती मार्च महिन्यातच पूर्ण करण्यात आली. सिमेंट रस्त्याच्या कामामुळे ग्रामीण भागात २५ कि.मी.चे लांबीचे रस्ते तयार होऊन स्थायी मालमत्ता निर्माण झाली व ग्रामस्थांना ये-जा करणे सुलभ झाले. नागपूर जिल्ह्यात योजनेच्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच अकुशल खर्चाचे प्रमाण १२ टक्क्याने वाढले आहे. सध्या अकुशल व कुशलचे प्रमाणे ६३ व ३७ इतके आहे. (प्रतिनिधी) मजुरी प्रदानातही प्रथम क्रमांकावर नागपूर जिल्हा हा मजुरीच्या प्रदानातही राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. विहित मुदतीत मजुरी प्रदानामध्ये नागपूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या ६६.४८ टक्के प्रदाने विहित मुदतीत अदा करण्यात येतात. १०० टक्के प्रदाने विहित मुदतीत करण्याकरिता प्रयत्न केले जात आहे. अंतर्गत कामांच्या ‘असेट मॅपिंग’ आणि जीआयएस मॅपिंगमध्ये सुद्धा नागपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.