शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Nagpur: सुनील केदार प्रकरणामध्ये सरकार वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करणार, हायकोर्टात माहिती

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 24, 2024 18:47 IST

Nagpur News: माजी मंत्री सुनील केदार यांनी दोषसिद्धीला स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. राज्य सरकार या प्रकरणात स्वत:ची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकिलाची विशेष नियुक्ती करणार आहे. त्याकरिता न्यायालयाने सरकारला येत्या गुरुवारपर्यंत वेळ दिलाय.

- राकेश घानोडेनागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा केल्यामुळे कमाल पाच वर्षे सश्रम कारावास व एकूण १२ लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी मंत्री सुनील केदार यांनी दोषसिद्धीला स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. राज्य सरकार या प्रकरणात स्वत:ची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकिलाची विशेष नियुक्ती करणार आहे. त्याकरिता न्यायालयाने सरकारला येत्या गुरुवारपर्यंत वेळ दिलाय.

या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सहायक सरकारी वकील ॲड. नीरज जावडे यांनी सरकार वरिष्ठ वकील नियुक्त करणार असल्याचे सांगून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३ जुलैपर्यंत वेळ देण्याची विनंती केली. केदार यांचे वकील वरिष्ठ ॲड. एस. के. मिश्रा यांनी या प्रकरणावर तातडीने निर्णय होणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडून सरकारला एवढा वेळ देण्यास विरोध केला. त्यामुळे न्यायालयाने सरकारला येत्या गुरुवारपर्यंतच वेळ दिला. या प्रकरणात सरकारच्या वतीने महाधिवक्ता वरिष्ठ ॲड. बिरेंद्र सराफ बाजू मांडतील हे आधी निर्धारित झाले होते. परंतु, ते इतर काही महत्वाच्या प्रकरणांत व्यस्त असल्यामुळे सरकारने अन्य वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

केदार यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २२ डिसेंबर २०२३ रोजी विविध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून संबंधित शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे केदार यांना राज्यघटनेतील आर्टिकल १९१(१) व लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८ (३) अनुसार आमदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाने २३ डिसेंबर २०२३ रोजी अधिसूचना जारी केली आहे. केदार यांना ही कारवाई रद्द करण्यासाठी दोषसिद्धीला स्थगिती मिळविणे आवश्यक आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय