शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
3
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
4
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
5
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
6
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
7
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
8
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
9
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
10
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
11
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
12
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
13
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
14
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
15
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
16
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
17
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

नागपूर; रिडींग न घेताच पाठवले जात आहे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 10:22 IST

तब्बल सहा महिने रिडींग न घेताच बिल पाठवण्यात आल्याची तक्रार एका महिला ग्राहकाने वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह थेट ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देग्राहक त्रस्तकार्यकारी अभियंत्यासह ऊर्जामंत्र्यांकडेही तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज विभागात पारदर्शी कारभार राहावा म्हणून अनेक योजना राबवल्या जात आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली जात आहे. परंतु ग्राहकांचा त्रास मात्र कमी झाल्याचे दिसून येत नाही. तब्बल सहा महिने रिडींग न घेताच बिल पाठवण्यात आल्याची तक्रार एका महिला ग्राहकाने वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह थेट ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.हिराबाई चंद्रकांत आंबे असे या तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. हिराबाई या प्लॉट नंबर १ ओम आदरणीय सोसायटी बेसा, बेलतरोडी मार्ग येथे राहतात. त्यांचा वीज मीटरचा क्रमांक ४१३२५०५११५९३ हा आहे. मे २०१७ ते आॅक्टोबर २०१७ पर्यंत त्यांना वीज मिटरचे रिंडींग न घेताच बिल पाठवले जात आहे. या सहाही महिन्याचा वापर युनिट हे २०४ इतकेच दाखवण्यात आले आहे. हे बिल त्यांनी भरले सुद्धा. यानंतर गेल्या काही महिन्यात त्यांना अचानक मोठ्या प्रमाणावर बिल पाठवले जात आहे.गेल्या २१ फेब्रुवारी रोजी त्यांना एक नोटीस, पाठवण्यात आली. त्यात १ लाख ९७९ रुपयाची वीज बिल थकीत असून १५ दिवसात भरण्याचे निर्देश देण्यात आले. पैसै भरले नाही म्हणून मीटर कापून नेले. मुळात रिडींग न घेताच इतके बिल आलेच कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यासंबंधात त्यांनी कार्यकारी अभियंता व ऊर्जामंत्र्यांकडेही लेखी तक्रार केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण