शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: जीर्ण इमारती व धोकादायक वायरिंगमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

By गणेश हुड | Updated: July 4, 2024 19:24 IST

Nagpur News: ​​​​​​​नागपूर जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्या धोकादायक शाळांच्या इमारती पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्याची गरज आहे.  पण, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे १५०  पेक्षा जास्त शाळा खोल्या धोकादायक आहेत.

- गणेश हूड नागपूर  -  जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्या धोकादायक शाळांच्या इमारती पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्याची गरज आहे.  पण, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे १५०  पेक्षा जास्त शाळा खोल्या धोकादायक आहेत. गेल्या सहा ते सात वर्षांपासून त्याबाबत नुसतीच चर्चा होत आहे. त्यात इलेक्ट्रीक वायरिंग नादुरूस्त असल्याने  अशा शाळांतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जि.प.च्या १५१२ शाळा आहेत. या शाळांत ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सातत्याने या शाळांना विविध योजना व निधीच्या माध्यमातून शासनाकडून विकास साधण्याचा प्रयत्न होत असतो. जि.प.च्या माध्यमातूनही साहित्यांची खरेदी करून या शाळांना पुरवठा करण्यात येतो. मात्र  आजही जिल्ह्यामध्ये दिडशेहून अधिक शाळांच्या वर्गखोल्या तुन -चार दशकांपूर्वीच्या आहेत. अशा  इमारतींची अवस्था तर बिकट झालीच आहे. याशिवाय इलेक्ट्रीक वायरिंगही धोकादायक झाली आहे. अशा शाळांमध्ये सेस फंडाच्या निधीतून विद्युत व्यवस्था सुधारण्याची नितांत गरज आहे. परंतु  पदाधिकारी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शाळांच्या डागडुजीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची तरतूद केली जाते. परंतु वर्षाअखेर यातील बहुतांशी निधी इतर हेडवर वळता केला जातो.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्वच्छतागृहात पडून असलेल्या इलेक्ट्रीक वायरचा करंट बसून एका सहा वर्षीय चिमुकलीला प्राणापासून मुकावे लागले. भंडाऱ्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातही अशीच दुदैवी घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर