शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

Nagpur: जीर्ण इमारती व धोकादायक वायरिंगमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

By गणेश हुड | Updated: July 4, 2024 19:24 IST

Nagpur News: ​​​​​​​नागपूर जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्या धोकादायक शाळांच्या इमारती पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्याची गरज आहे.  पण, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे १५०  पेक्षा जास्त शाळा खोल्या धोकादायक आहेत.

- गणेश हूड नागपूर  -  जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्या धोकादायक शाळांच्या इमारती पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्याची गरज आहे.  पण, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे १५०  पेक्षा जास्त शाळा खोल्या धोकादायक आहेत. गेल्या सहा ते सात वर्षांपासून त्याबाबत नुसतीच चर्चा होत आहे. त्यात इलेक्ट्रीक वायरिंग नादुरूस्त असल्याने  अशा शाळांतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जि.प.च्या १५१२ शाळा आहेत. या शाळांत ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सातत्याने या शाळांना विविध योजना व निधीच्या माध्यमातून शासनाकडून विकास साधण्याचा प्रयत्न होत असतो. जि.प.च्या माध्यमातूनही साहित्यांची खरेदी करून या शाळांना पुरवठा करण्यात येतो. मात्र  आजही जिल्ह्यामध्ये दिडशेहून अधिक शाळांच्या वर्गखोल्या तुन -चार दशकांपूर्वीच्या आहेत. अशा  इमारतींची अवस्था तर बिकट झालीच आहे. याशिवाय इलेक्ट्रीक वायरिंगही धोकादायक झाली आहे. अशा शाळांमध्ये सेस फंडाच्या निधीतून विद्युत व्यवस्था सुधारण्याची नितांत गरज आहे. परंतु  पदाधिकारी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शाळांच्या डागडुजीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची तरतूद केली जाते. परंतु वर्षाअखेर यातील बहुतांशी निधी इतर हेडवर वळता केला जातो.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्वच्छतागृहात पडून असलेल्या इलेक्ट्रीक वायरचा करंट बसून एका सहा वर्षीय चिमुकलीला प्राणापासून मुकावे लागले. भंडाऱ्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातही अशीच दुदैवी घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर