शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, पण राज्यात आठव्या क्रमांकावर

By आनंद डेकाटे | Updated: May 21, 2024 15:59 IST

नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के मागच्या वर्षीच्या तुलनेत १.७७ टक्के वाढ : विभागात गोंदिया जिल्हा अव्वल, वर्धा सर्वात कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के इतका लागला आहे.  मागील वर्षाच्या तुलनेत १.७७ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. परंतु, राज्यात नागपूर विभाग आठव्या क्रमांकावरच आहे. नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्हा ९५.२४ टक्क्यांनी अव्वल ठरला आहे. तर वर्धा जिल्ह्याचा निकाल ८९.४० टक्यांसह सर्वात कमी आहे.

करोना काळात मिळालेले गृह परीक्षा केंद्र, कमी अभ्यासक्रम आणि अतिरिक्त वेळ या सवलतींचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी दोन वर्षे शिक्षण मंडळाच्या मागील वर्षीच्या निकालात भरारी घेतली होती. यामुळे नागपूर विभागाच्या निकालातही वाढ झाली होती. मात्र, सवलती बंद होताच नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी कमी झाली हाेती. यंदा विभागाने काहीशी कामगिरी सुधारली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नागपूर विभागाचा निकाल ९०.३५ टक्के होता. यात आता १.७७ टक्के वाढ होऊन ९२.१२ झाला आहे. 

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये विभागातून १ लाख ५६ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ५५ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४३ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.१२ इतकी आहे. करोना काळात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, दोन वर्षांपासून या सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.०८ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ८६.११ टक्के लागला आहे.

यंदाही मुलीच अव्वलमंगळवारी दुपारी १ वाजता राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे. नागपूर विभागाच्या निकालात मुलांची टक्केवारी – ८९.८५ टक्के तर मुलींची टक्केवारी ९४.४६ इतकी आहे. विभागातील स्थिती एकूण नोंदणी- १,५६,३४२परीक्षा देणारे विद्यार्थी- १,५५,३७४उत्तीर्ण विद्यार्थी – १,४३,१३१एकूण टक्केवारी – ९२.१२ - 

विभागातील जिल्हानिहाय टक्केवारीगोंदिया - ९५.२४ टक्के भंडारा - ९४.६८ टक्के गडचिरोली - ९४.४२ टक्के चंद्रपूर - ९३.८९  टक्के नागपूर - ८९.९३ टक्के वर्धा - ८९.४० टक्के एकूण - ९२.१२ टक्के 

शाखानिहाय निकालविज्ञान- ९७.०८वाणिज्य – ८७.२८कला – ८६.११एमसीव्हीसी – ८७.६१आयटी – ८०.९७

टॅग्स :nagpurनागपूरResult Dayपरिणाम दिवस