शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

नागपूर विभागात ३ हजार ४३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 10:43 IST

नागपूर विभागातील ६४ ब्लॉकपैकी ५४ ब्लॉक हागणदरीमुक्त जाहीर झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ६४३ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ४३७ म्हणजेच विभागात ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांची माहितीस्वच्छ भारत मिशनचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागातील ६४ ब्लॉकपैकी ५४ ब्लॉक हागणदरीमुक्त जाहीर झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ६४३ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ४३७ म्हणजेच विभागात ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील स्वच्छ भारत मिशनचा आढावा केंद्रीय सहसचिव अरुण बरोमा यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव रुचेश जयवंशी, वर्ल्ड बँकेचे प्रतिनिधी राघवन आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बरोमा म्हणाले, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर व वर्धा येथे शंभर टक्के हागणदारीमुक्त गावे जाहीर झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील काम प्रगतिपथावर आहे.विभागात बेसलाईन सर्वेनुसार १३ लाख ७१ हजार ८३२ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यात २ लाख ७ हजार ६२६, चंद्रपूर ३ लाख ३ हजार ९५, गडचिरोली १ लाख ६० हजार १२९, गोंदिया २ लाख १७ हजार १२३, नागपूर २ लाख ९१ हजार ५५ तर वर्धा जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ८०४ शौचालय असलेल्या कुटुंबांची संख्या आहे. ग्रामीण भागात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासोबत प्लास्टिकमुक्त गाव ही संकल्पना राबविण्याची आवश्यकता असून यासाठी लोकसहभाग मिळावा म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबावावी अशी सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केली. विभागातील पाच जिल्ह्यामध्ये हागणदारीमुक्तीचे कामाबद्दलही यावेळी त्यांनी माहिती दिली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान