शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नागपूर विभागात ३ हजार ४३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 10:43 IST

नागपूर विभागातील ६४ ब्लॉकपैकी ५४ ब्लॉक हागणदरीमुक्त जाहीर झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ६४३ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ४३७ म्हणजेच विभागात ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांची माहितीस्वच्छ भारत मिशनचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागातील ६४ ब्लॉकपैकी ५४ ब्लॉक हागणदरीमुक्त जाहीर झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ६४३ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ४३७ म्हणजेच विभागात ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील स्वच्छ भारत मिशनचा आढावा केंद्रीय सहसचिव अरुण बरोमा यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव रुचेश जयवंशी, वर्ल्ड बँकेचे प्रतिनिधी राघवन आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बरोमा म्हणाले, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर व वर्धा येथे शंभर टक्के हागणदारीमुक्त गावे जाहीर झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील काम प्रगतिपथावर आहे.विभागात बेसलाईन सर्वेनुसार १३ लाख ७१ हजार ८३२ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यात २ लाख ७ हजार ६२६, चंद्रपूर ३ लाख ३ हजार ९५, गडचिरोली १ लाख ६० हजार १२९, गोंदिया २ लाख १७ हजार १२३, नागपूर २ लाख ९१ हजार ५५ तर वर्धा जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ८०४ शौचालय असलेल्या कुटुंबांची संख्या आहे. ग्रामीण भागात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासोबत प्लास्टिकमुक्त गाव ही संकल्पना राबविण्याची आवश्यकता असून यासाठी लोकसहभाग मिळावा म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबावावी अशी सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केली. विभागातील पाच जिल्ह्यामध्ये हागणदारीमुक्तीचे कामाबद्दलही यावेळी त्यांनी माहिती दिली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान