शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नागपूर विभागात सहा महिन्यात २५८ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:09 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या २५८ जणांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देआयुष्याला कंटाळल्या होत्या १२७ महिलामनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमाची आकडेवारी

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाणही वाढत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या २५८ जणांची नोंद झाली आहे. यात पुरुषांची संख्या मोठी आहे. त्याच्या खालोखाल महिला, विद्यार्थी आणि शेतकरी आहेत.नैराश्यातून आत्महत्येकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतात आठ व्यक्तींमागे एकजण नैराश्यग्रस्त आहे. एका अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यामधील ४० टक्के पुरुष व ६० टक्के महिला आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या कितीतरी जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, वेळीच उपचाराला सुरुवात केल्यास नैराश्य ते आत्महत्या हा प्रवास टाळता येऊ शकतो. याच उद्देशाने प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले आहे. या कार्यक्रमातून रुग्णांना उपचारखाली आणून त्यांना नवे आयुष्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

घरगुती भांडणामधून आत्महत्येचा प्रयत्न अधिकआत्महत्येचा प्रयत्न किंवा त्या संदर्भातील विचार मनात घोळत राहण्यासाठी घरगुती भांडण हे मुख्य कारण आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आकडेवारीनुसार या कारणाला ४५ टक्के रुग्ण कारणीभूत आहे. त्यानंतर वित्तीय हानीच्या कारणासाठी ३० टक्के, दुर्धर आजारासाठी २० टक्के, जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे ३ टक्के तर परीक्षेत नापास झाल्याच्या कारणामुळे २ टक्के रुग्णांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.१३१ पुरुष होते आत्महत्येच्या उंबरठ्यावरकुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. याला सर्वात जास्त पुरुष बळी पडत आहे. परिणामी आत्महत्येचे विचार वाढत आहेत. २०१२ मध्ये ४५२, २०१३ मध्ये २५५, २०१४ मध्ये ३५५ तर २०१५ मध्ये ४६० २०१६ मध्ये १३५ तर आॅक्टोबर २०१७ पर्यंत १३१ पुरुषांनी आत्महत्येचा प्रयत्न किंवा विचार केला आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमीप्रादेशिक मनोरुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत १३१ पुरुषांनी तर १२७ महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न किंवा विचार केला. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या किंचित कमी असली तरी मागील पाच वर्षांच्या आकडेवारीत आत्महत्येचा प्रयत्न करणाºयांमध्ये महिलांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

१२ ते ३० वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यामुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढतच आहे. यात १२ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मनोरुग्णालयात गेल्या सहा महिन्यात १० विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रुग्णालयाच्या मनोचिकित्सकानुसार, पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे, ते जाणून घ्यायला हवे. त्यांच्याशी संवाद साधायला हवा.

प्रत्येक रुग्णांची वेगळी फाईलबदलत्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत आहेत. यांच्यावर वेळीच उपचार झाल्यास हे रुग्ण पूर्णत: बरे होतात. रुग्णालय प्रशासनाने अशा रुग्णांवर प्रभावी उपचारासाठी प्रत्येकाची स्वतंत्र फाईल तयार केली जात असून, त्याचा पाठपुरावाही केला जात आहे.-डॉ. प्रवीण नवखरे, वैद्यकीय उपअधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्यmental hospitalमनोरूग्णालय