शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपूर जिल्हा ‘जलयुक्त’कडून दुष्काळ’मुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 11:13 IST

जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्दे८८८ गावांमध्ये जलसंधारणाची कामे ‘डार्क झोन’मधील तीन तालुक्यांवर अधिक भर

सुनील चरपे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. संरक्षित सिंचनाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे सावनेरसह रामटेक, कुही, पारशिवनी व अन्य तालुक्यात जलसंधारणाची कामे करून तेथील पाणीसमस्या कायम दूर करणे गरजेचे आहे. शिवाय, या कामाच्या दर्जाबाबत रामटेक व उमरेड तालुक्यात तक्रारी प्राप्त झाल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.

काटोल तालुका अव्वल‘ऑरेंज बेल्ट’ म्हणून ओळख असलेला तसेच ‘डार्क झोन’मध्ये गेलेला काटोल तालुका जलयुक्त शिवार अभियानात अव्वल राहिला आहे. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या काळात काटोल तालुक्यातील १३४ गावांमध्ये या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यात आली. या तालुक्याच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत असलेला हा तालुका अभियानामध्ये जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

जलयुक्त शिवार कामेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत भूजल पुनर्भरण व संरक्षित सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नाला, विविध तलाव व लघु सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढणे, नाल्याचे खोलीकरण करून त्यावर मातीबांध, सीसीटी, दगडीबांध, गॅबियन बंधारे, भात खचरे (धानाच्या बांध्या), शेततळ्यांची निर्मिती करणे, सार्वजनिक व खासगी विहिरींचे पुनरुज्जीवन व खोलीकरण करून त्यांचे पुनर्भरण करणे, जनजागृती करणे, जमिनीची धूप टाळण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन आदी कामे करण्यात आली.

जलयुक्त शिवारचा फायदा डार्क झोनमधील काटोल व नरखेड तालुक्याला झाला. नाला खोलीकरण, बंधारे पुनरुज्जीवनामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. दोन वर्षातही मोठ्या प्रमाणात कामे झाली.- संदीप सरोदे,

या अभियानांतर्गत करण्यात आलेली कामे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली आहेत. शेतकऱ्यांची भांडणे टाळण्यासाठी नाल्याच्या खोलीकरणाची लांबी वाढवून कामाच्या दर्जात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.- महेंद्र दिवटे,माजी सरपंच, भंडारबोडी, ता. रामटेक.माजी सभापती, पंचायत समिती, काटोल.

टॅग्स :Waterपाणी