शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नागपूर जिल्हा ‘जलयुक्त’कडून दुष्काळ’मुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 11:13 IST

जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्दे८८८ गावांमध्ये जलसंधारणाची कामे ‘डार्क झोन’मधील तीन तालुक्यांवर अधिक भर

सुनील चरपे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. संरक्षित सिंचनाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे सावनेरसह रामटेक, कुही, पारशिवनी व अन्य तालुक्यात जलसंधारणाची कामे करून तेथील पाणीसमस्या कायम दूर करणे गरजेचे आहे. शिवाय, या कामाच्या दर्जाबाबत रामटेक व उमरेड तालुक्यात तक्रारी प्राप्त झाल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.

काटोल तालुका अव्वल‘ऑरेंज बेल्ट’ म्हणून ओळख असलेला तसेच ‘डार्क झोन’मध्ये गेलेला काटोल तालुका जलयुक्त शिवार अभियानात अव्वल राहिला आहे. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या काळात काटोल तालुक्यातील १३४ गावांमध्ये या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यात आली. या तालुक्याच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत असलेला हा तालुका अभियानामध्ये जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

जलयुक्त शिवार कामेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत भूजल पुनर्भरण व संरक्षित सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नाला, विविध तलाव व लघु सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढणे, नाल्याचे खोलीकरण करून त्यावर मातीबांध, सीसीटी, दगडीबांध, गॅबियन बंधारे, भात खचरे (धानाच्या बांध्या), शेततळ्यांची निर्मिती करणे, सार्वजनिक व खासगी विहिरींचे पुनरुज्जीवन व खोलीकरण करून त्यांचे पुनर्भरण करणे, जनजागृती करणे, जमिनीची धूप टाळण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन आदी कामे करण्यात आली.

जलयुक्त शिवारचा फायदा डार्क झोनमधील काटोल व नरखेड तालुक्याला झाला. नाला खोलीकरण, बंधारे पुनरुज्जीवनामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. दोन वर्षातही मोठ्या प्रमाणात कामे झाली.- संदीप सरोदे,

या अभियानांतर्गत करण्यात आलेली कामे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली आहेत. शेतकऱ्यांची भांडणे टाळण्यासाठी नाल्याच्या खोलीकरणाची लांबी वाढवून कामाच्या दर्जात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.- महेंद्र दिवटे,माजी सरपंच, भंडारबोडी, ता. रामटेक.माजी सभापती, पंचायत समिती, काटोल.

टॅग्स :Waterपाणी