शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर जि.प. कर्मचाऱ्यांची विदेशवारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 10:51 IST

एकीकडे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची वानवा असताना, जवळपास २० ते २५ कर्मचारी विदेशवारीवर गेले आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांसह चपराशाचाही समावेशप्रशासनाची दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची वानवा असताना, जवळपास २० ते २५ कर्मचारी विदेशवारीवर गेले आहेत. या विदेशवारीत चपऱ्याशाचाही समावेश असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे सीईओने भ्रष्ट प्रशासनावर अंकुश लावला असल्याचा दावा केला आहे. जि.प.चा चपराशीही विदेश वारी करू शकतो, तर भ्रष्टाचाराचे पाळेमुळे किती खोलवर रुजले आहे, यावरून स्पष्ट होतेय.सूत्रांच्या माहितीनुसार या वारीत मोठ्या संख्येने बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग सहभागी आहे. त्याचबरोबर वित्त विभाग व इतरही काही विभागातील कर्मचारी व पंचायत समितीतील कर्मचारी यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये सहा. प्रशासन अधिकारी, अकाऊंटंट, इंजिनीअर यांचाही समावेश आहे. बांधकाम विभागातील एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही वारी गेली आहे. वारीबद्दल अख्ख्या जिल्हा परिषदेत सद्या चर्चा रंगली आहे. सर्वात विशेष म्हणजे चपराशी या वारीत असल्याने या चर्चेला आणखी रंग चढला आहे.या वारीला गेलेल्यांनी प्रशासनाचीही दिशाभूल केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी विदेशात जाऊ नये असा काही नियम नाही. परंतु विदेशात जाताना कार्यालयाला अधिकृत माहिती देणे गरजेचे आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी सुटीचा अर्ज कार्यालय प्रमुखाला दिला आहे. परंतु त्यात खासगी कामानिमित्त सुटी हवी आहे असा उल्लेख केला आहे. काहींनी तर सुटीचा अर्जही दिलेला नाही.परंतु महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार विदेशवारी करताना कार्यालयातील सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु एकाही कर्मचाऱ्यांनी संबंधित विभाग प्रमुखाला विदेशवारीसाठी सुट्ट्या हव्यात अशा आशयाचा अर्जही केलेला नाही.

काय आहे नियममहाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २९ डिसेंबर २०१४ च्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी, कर्मचारी विदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी, पर्यटनासाठी, वैद्यकीय उपचारासाठी जात असेल तर, त्यांनी रजा मंजूर करण्यासाठी सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेण्यात यावी.प्रशासनाची दिशाभूल करणे चुकीचे आहे

कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्या शिल्लक असल्यामुळे त्यांनी विभाग प्रमुखांकडे सुटीचा अर्ज केला. मार्च एंडींगचे काम संपल्यामुळे विभाग प्रमुखांनी त्या मंजूरही केल्या. परंतु त्यांच्या सुटीच्या अर्जात देश सोडून जात असल्याचा उल्लेख नाही. शासकीय नियमानुसार जर त्यांनी विदेशात जाण्याचा उल्लेख केला असता तर तो नाकारलाही नसता. परंतु प्रशासनाची दिशाभूल त्यांनी केली आहे, हे चुकीचे आहे. भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांना देश सोडून जायचे असल्यास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी.- शरद डोणेकर, उपाध्यक्ष व सभापती बांधकाम विभाग

टॅग्स :zpजिल्हा परिषद