शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. कर्मचाऱ्यांची विदेशवारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 10:51 IST

एकीकडे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची वानवा असताना, जवळपास २० ते २५ कर्मचारी विदेशवारीवर गेले आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांसह चपराशाचाही समावेशप्रशासनाची दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची वानवा असताना, जवळपास २० ते २५ कर्मचारी विदेशवारीवर गेले आहेत. या विदेशवारीत चपऱ्याशाचाही समावेश असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे सीईओने भ्रष्ट प्रशासनावर अंकुश लावला असल्याचा दावा केला आहे. जि.प.चा चपराशीही विदेश वारी करू शकतो, तर भ्रष्टाचाराचे पाळेमुळे किती खोलवर रुजले आहे, यावरून स्पष्ट होतेय.सूत्रांच्या माहितीनुसार या वारीत मोठ्या संख्येने बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग सहभागी आहे. त्याचबरोबर वित्त विभाग व इतरही काही विभागातील कर्मचारी व पंचायत समितीतील कर्मचारी यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये सहा. प्रशासन अधिकारी, अकाऊंटंट, इंजिनीअर यांचाही समावेश आहे. बांधकाम विभागातील एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही वारी गेली आहे. वारीबद्दल अख्ख्या जिल्हा परिषदेत सद्या चर्चा रंगली आहे. सर्वात विशेष म्हणजे चपराशी या वारीत असल्याने या चर्चेला आणखी रंग चढला आहे.या वारीला गेलेल्यांनी प्रशासनाचीही दिशाभूल केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी विदेशात जाऊ नये असा काही नियम नाही. परंतु विदेशात जाताना कार्यालयाला अधिकृत माहिती देणे गरजेचे आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी सुटीचा अर्ज कार्यालय प्रमुखाला दिला आहे. परंतु त्यात खासगी कामानिमित्त सुटी हवी आहे असा उल्लेख केला आहे. काहींनी तर सुटीचा अर्जही दिलेला नाही.परंतु महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार विदेशवारी करताना कार्यालयातील सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु एकाही कर्मचाऱ्यांनी संबंधित विभाग प्रमुखाला विदेशवारीसाठी सुट्ट्या हव्यात अशा आशयाचा अर्जही केलेला नाही.

काय आहे नियममहाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २९ डिसेंबर २०१४ च्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी, कर्मचारी विदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी, पर्यटनासाठी, वैद्यकीय उपचारासाठी जात असेल तर, त्यांनी रजा मंजूर करण्यासाठी सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेण्यात यावी.प्रशासनाची दिशाभूल करणे चुकीचे आहे

कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्या शिल्लक असल्यामुळे त्यांनी विभाग प्रमुखांकडे सुटीचा अर्ज केला. मार्च एंडींगचे काम संपल्यामुळे विभाग प्रमुखांनी त्या मंजूरही केल्या. परंतु त्यांच्या सुटीच्या अर्जात देश सोडून जात असल्याचा उल्लेख नाही. शासकीय नियमानुसार जर त्यांनी विदेशात जाण्याचा उल्लेख केला असता तर तो नाकारलाही नसता. परंतु प्रशासनाची दिशाभूल त्यांनी केली आहे, हे चुकीचे आहे. भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांना देश सोडून जायचे असल्यास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी.- शरद डोणेकर, उपाध्यक्ष व सभापती बांधकाम विभाग

टॅग्स :zpजिल्हा परिषद