शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चारा साक्षरता अभियानात सहभागी व्हावे : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

ठळक मुद्दे रथ गावागावात रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.पशुसंवर्धन विभागातर्फे दुष्काळी भागातील गोधन वाचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या चारा साक्षरता अभियानाला मंगळवारपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याहस्ते ज्योत प्रज्वलित करून चारा अभियानाचा रथ गावागावात रवाना केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जि.प.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर, प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त डॉ. किशोर कुमरे, सहा. आयुक्त डॉ. मंगेश काळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे, डॉ. राजेंद्र रेवतकर, डॉ. मनोहर लाडुकर, डॉ. सुजित तापस, डॉ. मोहम्मद तालिब, डॉ. संजय मानकर, डॉ. अविरत सवईमुल, डॉ. मजहर इलाही, डॉ. विलास गावकरे, डॉ. राजेश ब्राह्मणकर, विनोद समर्थ आदी उपस्थित होते.चारा अभियानांतर्गत जनजागृतीचे माध्यमातून जनावरांचे चारा व्यवस्थापन संबंधिचे तंत्रज्ञान जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी चारा साक्षरता अभियानाशी जोडले जातील, असा आशावाद जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला. हे अभियान १ ते १० जानेवारी दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये चारा रथ फिरणार असून, गावकऱ्यांना चारा टिकविण्याचे प्रात्याक्षिक, चारा प्रक्रियेचे प्रात्याक्षिक, बहुवार्षिक चारा पिके, हिरव्या चाऱ्याचे महत्त्व, मुराघासमध्ये रूपांतर आदी माहिती देण्यात येणार आहे. यासाठी तीन तज्ज्ञांच्या टीम पशुसंवर्धन विभागाने तयार केल्या आहे.महाराष्ट्र राज्य सध्या नजिकच्या काळात सर्वात जास्त चारा टंचाईस सामोरा जात आहे. महाराष्ट्र राज्यात सन २०१८ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त १०८ तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल व नरखेड या तीन तालुक्यांचाही समावेश आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर चारापिकांचे बियाणे व खते वाटप ही योजना राबविण्यात आली. त्यास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.वैरण बियाणे वाटप  योजनेचा लाभ घ्यादुष्काळी परिस्थितीची दाहकता कमी करण्याच्या हेतूने पशुसंवर्धन विभागामार्फत जलाशय किंवा तलावाखालील गाळपेर जमिनीवर रबी व हिवाळी हंगामासाठी वैरण बियाणे लागवडीकरिता नाममात्र दरावर गाळपेर जमिनी उपलब्ध करण्यास्तव जिल्ह्याला दोन हजार हेक्टर लक्ष्य प्राप्त आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजन व लाभार्थी निवड झालेली आहे. तसेच सदर योजनेत गाळपेर जमिनीव्यतिरिक्त ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांचेकडे २ हेक्टर क्षेत्राकरिता चारा पिकांची लागवड करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून या करीता तालुक्यातील पशुसंवर्धन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर