शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

चारा साक्षरता अभियानात सहभागी व्हावे : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

ठळक मुद्दे रथ गावागावात रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.पशुसंवर्धन विभागातर्फे दुष्काळी भागातील गोधन वाचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या चारा साक्षरता अभियानाला मंगळवारपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याहस्ते ज्योत प्रज्वलित करून चारा अभियानाचा रथ गावागावात रवाना केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जि.प.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर, प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त डॉ. किशोर कुमरे, सहा. आयुक्त डॉ. मंगेश काळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे, डॉ. राजेंद्र रेवतकर, डॉ. मनोहर लाडुकर, डॉ. सुजित तापस, डॉ. मोहम्मद तालिब, डॉ. संजय मानकर, डॉ. अविरत सवईमुल, डॉ. मजहर इलाही, डॉ. विलास गावकरे, डॉ. राजेश ब्राह्मणकर, विनोद समर्थ आदी उपस्थित होते.चारा अभियानांतर्गत जनजागृतीचे माध्यमातून जनावरांचे चारा व्यवस्थापन संबंधिचे तंत्रज्ञान जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी चारा साक्षरता अभियानाशी जोडले जातील, असा आशावाद जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला. हे अभियान १ ते १० जानेवारी दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये चारा रथ फिरणार असून, गावकऱ्यांना चारा टिकविण्याचे प्रात्याक्षिक, चारा प्रक्रियेचे प्रात्याक्षिक, बहुवार्षिक चारा पिके, हिरव्या चाऱ्याचे महत्त्व, मुराघासमध्ये रूपांतर आदी माहिती देण्यात येणार आहे. यासाठी तीन तज्ज्ञांच्या टीम पशुसंवर्धन विभागाने तयार केल्या आहे.महाराष्ट्र राज्य सध्या नजिकच्या काळात सर्वात जास्त चारा टंचाईस सामोरा जात आहे. महाराष्ट्र राज्यात सन २०१८ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त १०८ तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल व नरखेड या तीन तालुक्यांचाही समावेश आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर चारापिकांचे बियाणे व खते वाटप ही योजना राबविण्यात आली. त्यास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.वैरण बियाणे वाटप  योजनेचा लाभ घ्यादुष्काळी परिस्थितीची दाहकता कमी करण्याच्या हेतूने पशुसंवर्धन विभागामार्फत जलाशय किंवा तलावाखालील गाळपेर जमिनीवर रबी व हिवाळी हंगामासाठी वैरण बियाणे लागवडीकरिता नाममात्र दरावर गाळपेर जमिनी उपलब्ध करण्यास्तव जिल्ह्याला दोन हजार हेक्टर लक्ष्य प्राप्त आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजन व लाभार्थी निवड झालेली आहे. तसेच सदर योजनेत गाळपेर जमिनीव्यतिरिक्त ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांचेकडे २ हेक्टर क्षेत्राकरिता चारा पिकांची लागवड करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून या करीता तालुक्यातील पशुसंवर्धन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर