शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

चारा साक्षरता अभियानात सहभागी व्हावे : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

ठळक मुद्दे रथ गावागावात रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.पशुसंवर्धन विभागातर्फे दुष्काळी भागातील गोधन वाचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या चारा साक्षरता अभियानाला मंगळवारपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याहस्ते ज्योत प्रज्वलित करून चारा अभियानाचा रथ गावागावात रवाना केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जि.प.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर, प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त डॉ. किशोर कुमरे, सहा. आयुक्त डॉ. मंगेश काळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे, डॉ. राजेंद्र रेवतकर, डॉ. मनोहर लाडुकर, डॉ. सुजित तापस, डॉ. मोहम्मद तालिब, डॉ. संजय मानकर, डॉ. अविरत सवईमुल, डॉ. मजहर इलाही, डॉ. विलास गावकरे, डॉ. राजेश ब्राह्मणकर, विनोद समर्थ आदी उपस्थित होते.चारा अभियानांतर्गत जनजागृतीचे माध्यमातून जनावरांचे चारा व्यवस्थापन संबंधिचे तंत्रज्ञान जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी चारा साक्षरता अभियानाशी जोडले जातील, असा आशावाद जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला. हे अभियान १ ते १० जानेवारी दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये चारा रथ फिरणार असून, गावकऱ्यांना चारा टिकविण्याचे प्रात्याक्षिक, चारा प्रक्रियेचे प्रात्याक्षिक, बहुवार्षिक चारा पिके, हिरव्या चाऱ्याचे महत्त्व, मुराघासमध्ये रूपांतर आदी माहिती देण्यात येणार आहे. यासाठी तीन तज्ज्ञांच्या टीम पशुसंवर्धन विभागाने तयार केल्या आहे.महाराष्ट्र राज्य सध्या नजिकच्या काळात सर्वात जास्त चारा टंचाईस सामोरा जात आहे. महाराष्ट्र राज्यात सन २०१८ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त १०८ तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल व नरखेड या तीन तालुक्यांचाही समावेश आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर चारापिकांचे बियाणे व खते वाटप ही योजना राबविण्यात आली. त्यास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.वैरण बियाणे वाटप  योजनेचा लाभ घ्यादुष्काळी परिस्थितीची दाहकता कमी करण्याच्या हेतूने पशुसंवर्धन विभागामार्फत जलाशय किंवा तलावाखालील गाळपेर जमिनीवर रबी व हिवाळी हंगामासाठी वैरण बियाणे लागवडीकरिता नाममात्र दरावर गाळपेर जमिनी उपलब्ध करण्यास्तव जिल्ह्याला दोन हजार हेक्टर लक्ष्य प्राप्त आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजन व लाभार्थी निवड झालेली आहे. तसेच सदर योजनेत गाळपेर जमिनीव्यतिरिक्त ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांचेकडे २ हेक्टर क्षेत्राकरिता चारा पिकांची लागवड करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून या करीता तालुक्यातील पशुसंवर्धन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर