शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा बँक शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्ज वसुली करणार; राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे संकेत

By कमलेश वानखेडे | Updated: March 28, 2025 16:08 IST

दोन वर्षात नागपूर जिल्हा बँक नफ्यात आणण्याचा दावा : गुढीपडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांकडे ४४९ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहेत. कर्ज माफी होईल या आशेने किंवा इतर कारणांनी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाही. घेतलेले कर्ज भरणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कर्जवसुलीसाठी बँकेतर्फे एकमुस्त कर्ज परतफेड योजना (ओटीएस) आखली जाईल. त्यानंतरही शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही तर सक्तीने वसुली करणे हा शेवटचा पर्याय असेल, असे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी स्पष्ट केले. याशिवाय टॉप टेन थकबाकीदारांकडे कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ते वसूल करण्यासाठी कडक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नागपूर जिल्हा बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेची नियुक्ती केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य बँक पदभार स्वीकारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दहा वर्षांपासून प्रशासक असूनही बँकेची परिस्थिती बदलली नाही. व्यक्तिगत प्रशसकाला मर्यादा असतात. त्यामुळेच राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेला प्रशासक नेमून प्रथमच एखाद्या बँकेवर संस्थात्मक प्रशासक नेमला आहे. राज्य बँकेकडे असलेले मनुष्यबळ, कौशल्य व संसाधनांचा वापर करून जिल्हा बँकेच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील. बँकिंगला चालना देऊन दोन वर्षात जिल्हा बँक नफ्यात येईल व या बँकेला गतवैभव मिळेल, असा दावा अनास्कर यांनी केला.

सध्या नागपूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. बँकेच्या अनेक शाखांमध्ये पास बूक प्रिंट करण्याची सोय नाही, नोटा मोजण्याचे मशीन बंद पडले आहे. रिझर्व्ह बँकेच्या बंधनांमुळे बँकेला एकावेळी ५ हजार रुपायंवर खर्च करता येत नाही. त्यामळे या बँकेची वाढ खुंटली आहे. डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेचे विलिनीकरण करावे, असा पर्याय नाबार्डने सूचविला होता. पण तसे केले तर त्रिस्तरीय रचना कोलमडेल. त्यामुळे या बँकेवर संस्थात्मक प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला. राज्य सरकारने तो स्वीकारून राज्य बँकेवर जबाबदारी सोपविली. राज्य बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. ५ हजार ४७ कोटींचे नेटवर्थ आहे. इथुन पुढे जिल्हा बँकेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य बँक काम करेल. जिल्हा बँकेच्या मालमत्ता विकून निधी उभारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, मुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने, डॉ. अनंत भुईभार, नारायण जाधव उपस्थित होते.

ठेवींची राज्य बँक घेणार हमीजिल्हा बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून राज्य बँकेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून जिल्हा बँकेत ठेवण्यात येणाऱ्या कुठल्याही ठेवींना राज्य बँकेची हमी असेल.जिल्हा परिषद व शिक्षकांची खाती परत द्यावीजिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे पगार, शिक्षकांचे पगार, अंगणवाडी सेविकांचे पगार, यासह अनुदान पूर्वी जिल्हा बँकेमार्फत वाटप केले जायचे. ही सर्व खाती परत जिल्हा बँकेकडे द्यावी. या व्यवहारांची हमी राज्य बँक घेईल, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य बँकेने दिले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर