शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जिल्ह्यात कापूस लागवडीच्या क्षेत्रात १० हजार हेक्टरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:09 IST

कृषी विभागाने जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या नियोजनात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र ७५०० हेक्टरने घसरले आहे. मात्र कापसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र भातापेक्षाही कमी झाले आहे.

ठळक मुद्देखरिपाचे नियोजन मात्र ७५०० हेक्टरने घसरले : सोयाबीनच्या क्षेत्रात घट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या नियोजनात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र ७५०० हेक्टरने घसरले आहे. मात्र कापसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र भातापेक्षाही कमी झाले आहे.यावर्षी कृषी विभागाने जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र २ लाख ३५ हजार हेक्टर हे कापसाच्या लागवडीखाली येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे. २ लाख ३५ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार ४ हजार ५०० क्विंटलवर बीटी कापसाचे बियाणे लागणार आहे. तर खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रानुसार ८५ हजार क्विंटलवर बियाणे लागणार आहे. कापसाच्या खालोखाल भाताचे (धान) लागवडी क्षेत्र राहणार आहे. यंदा भाताचा पेरा ९५ हजार हेक्टरवर होणार आहे. त्या खालोखाल सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचा यंदा ८५ हजार हेक्टरवर पेरा राहणार आहे. तुरीची ६५ हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. संकरित ज्वारीच्या लागवडीचे क्षेत्र ३ हजार हेक्टरने घटले आहे. मक्याचा पेरा ५ हजार हेक्टरवर राहणार आहे. तर तीळ ३०० हेक्टरवर लावले जाणार आहे. उडीद, मूग प्रत्येक १५०० हेक्टरवर लावण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. उसाचा पेरा ३ हजार हेक्टरवर राहणार आहे. कापूस बियाण्यांची टंचाई नाही. कृषी विभागाने महाबीजकडे २० हजार क्विंटलवर बियाण्यांची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा बियाण्यांची टंचाई जाणवणार नाही अशी अपेक्षा आहे. सोबतच कृषी सेवा केंद्रातही मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. याशिवाय सर्वच पिकांचे अधिक उत्पादन देणाऱ्या प्रचलित वाणांचे दर्जेदार बियाणे कृषी सेवा केंद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रासायनिक खतांची उपलब्धतासुद्धा समाधानकारक असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवातकापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावागावात सोशल मीडिया (व्हॉट्सअ‍ॅप)च्या माध्यमातून कृषी सहायक शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत. सोबतच बियाण्यांचे सॅम्पलिंग काढणेही सुरू आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहे. 

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती