शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नागपुरात जिल्ह्यात कापूस लागवडीच्या क्षेत्रात १० हजार हेक्टरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:09 IST

कृषी विभागाने जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या नियोजनात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र ७५०० हेक्टरने घसरले आहे. मात्र कापसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र भातापेक्षाही कमी झाले आहे.

ठळक मुद्देखरिपाचे नियोजन मात्र ७५०० हेक्टरने घसरले : सोयाबीनच्या क्षेत्रात घट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या नियोजनात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र ७५०० हेक्टरने घसरले आहे. मात्र कापसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र भातापेक्षाही कमी झाले आहे.यावर्षी कृषी विभागाने जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र २ लाख ३५ हजार हेक्टर हे कापसाच्या लागवडीखाली येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे. २ लाख ३५ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार ४ हजार ५०० क्विंटलवर बीटी कापसाचे बियाणे लागणार आहे. तर खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रानुसार ८५ हजार क्विंटलवर बियाणे लागणार आहे. कापसाच्या खालोखाल भाताचे (धान) लागवडी क्षेत्र राहणार आहे. यंदा भाताचा पेरा ९५ हजार हेक्टरवर होणार आहे. त्या खालोखाल सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचा यंदा ८५ हजार हेक्टरवर पेरा राहणार आहे. तुरीची ६५ हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. संकरित ज्वारीच्या लागवडीचे क्षेत्र ३ हजार हेक्टरने घटले आहे. मक्याचा पेरा ५ हजार हेक्टरवर राहणार आहे. तर तीळ ३०० हेक्टरवर लावले जाणार आहे. उडीद, मूग प्रत्येक १५०० हेक्टरवर लावण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. उसाचा पेरा ३ हजार हेक्टरवर राहणार आहे. कापूस बियाण्यांची टंचाई नाही. कृषी विभागाने महाबीजकडे २० हजार क्विंटलवर बियाण्यांची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा बियाण्यांची टंचाई जाणवणार नाही अशी अपेक्षा आहे. सोबतच कृषी सेवा केंद्रातही मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. याशिवाय सर्वच पिकांचे अधिक उत्पादन देणाऱ्या प्रचलित वाणांचे दर्जेदार बियाणे कृषी सेवा केंद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रासायनिक खतांची उपलब्धतासुद्धा समाधानकारक असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवातकापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावागावात सोशल मीडिया (व्हॉट्सअ‍ॅप)च्या माध्यमातून कृषी सहायक शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत. सोबतच बियाण्यांचे सॅम्पलिंग काढणेही सुरू आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहे. 

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती