शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी नागपूर ते दिल्ली पदयात्रा

By admin | Updated: August 22, 2014 00:39 IST

५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान नागपूर ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी दिली.

अकोला : वेगळ्या विदर्भाची मागणी घेऊन विदर्भ फेडरेशन समितीच्या वतीने ५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान नागपूर ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी दिली. या पदयात्रेत १00 विदर्भप्रेमी सहभागी होणार असून, पदयात्रा मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या पाच राज्यातून जाणार आहे. १,0५0 किमीचा प्रवास २८ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. वेगळ्या विदर्भाबाबत जनजागृती व्हावी व सरकारला विदर्भातील नागरिकांच्या भावना कळाव्या, याकरिता ही पदयात्रा काढण्यात येत आहे. ५ सप्टेंबर रोजी नागपूर येथील व्हेरायटी चौकातून पदयात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी आतापर्यंत अनेकदा विविध संघटना व राजकीय पुढार्‍यांकडून करण्यात आली. मात्र, त्याला फारसे बळ मिळाले नाही. वेगळ्या विदर्भाला विरोध करणारे शिवसेना व काँग्रेसचे नेते यांची शक्ती जास्त होती. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाची मागणी करणार्‍या सर्व संघटनांना एकत्र करून विदर्भ फेडरेशन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही संघटना अराजकीय आहे. तसेच या संघटनेचा कुणीही अध्यक्ष नाही. २0१0 पासून या संघटनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत आहे. नागपूर करारानुसार जो वाटा विदर्भाला मिळायला हवा होता तो मिळाला नाही. या कराराची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी वाढत आहे. सिंचनाचा अनुशेष वाढत असल्याचे कोंडबत्तूनवार यांनी सांगितले. यावेळी भाऊराव बघेल, गणेश पोटे, अहमद कादर उपस्थित होते.