शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले
2
"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 
3
पाकिस्तानी खेळाडूने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा केला अपमान, निवृत्तीबद्दल केलं 'हे' विधान
4
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे हाफिज सईदच्या मुलाला भरली धडकी! म्हणतोय "मला सोडा,मी काहीच केलं नाहीये..."
6
Homeguard Bharti: होमगार्ड भरतीसाठी फिजिकल टेस्ट देताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, पाकिस्तान...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला थेट इशारा
8
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
9
अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?
10
Astro Tips: व्यवसाय करावासा वाटतोय, पण जमेल का ही मनात शंका? २० सेकंदात मिळेल उत्तर!
11
Swami Samartha: स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर आधी 'हे' नियम वाचा!
12
ऑफिसमधील महिला पतीला म्हणाली 'बेबी', ऐकताच हायपर झाली पत्नी! भर सोसायटीत हाय व्हॉल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ
13
आरबीआयची 'आर्थिक' ताकद वाढली! सोन्याचा साठा विक्रमी पातळीवर, बँकेच्या तिजोरीत काय-काय आहे?
14
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
15
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
16
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
17
IND vs AUS मालिकेचे वेळापत्रक BCCIने केलं जाहीर, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रंगणार 'रनसंग्राम'
18
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
19
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
20
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...

वेगळ्या विदर्भासाठी नागपूर ते दिल्ली पदयात्रा

By admin | Updated: August 22, 2014 00:39 IST

५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान नागपूर ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी दिली.

अकोला : वेगळ्या विदर्भाची मागणी घेऊन विदर्भ फेडरेशन समितीच्या वतीने ५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान नागपूर ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी दिली. या पदयात्रेत १00 विदर्भप्रेमी सहभागी होणार असून, पदयात्रा मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या पाच राज्यातून जाणार आहे. १,0५0 किमीचा प्रवास २८ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. वेगळ्या विदर्भाबाबत जनजागृती व्हावी व सरकारला विदर्भातील नागरिकांच्या भावना कळाव्या, याकरिता ही पदयात्रा काढण्यात येत आहे. ५ सप्टेंबर रोजी नागपूर येथील व्हेरायटी चौकातून पदयात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी आतापर्यंत अनेकदा विविध संघटना व राजकीय पुढार्‍यांकडून करण्यात आली. मात्र, त्याला फारसे बळ मिळाले नाही. वेगळ्या विदर्भाला विरोध करणारे शिवसेना व काँग्रेसचे नेते यांची शक्ती जास्त होती. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाची मागणी करणार्‍या सर्व संघटनांना एकत्र करून विदर्भ फेडरेशन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही संघटना अराजकीय आहे. तसेच या संघटनेचा कुणीही अध्यक्ष नाही. २0१0 पासून या संघटनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत आहे. नागपूर करारानुसार जो वाटा विदर्भाला मिळायला हवा होता तो मिळाला नाही. या कराराची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी वाढत आहे. सिंचनाचा अनुशेष वाढत असल्याचे कोंडबत्तूनवार यांनी सांगितले. यावेळी भाऊराव बघेल, गणेश पोटे, अहमद कादर उपस्थित होते.