शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपुरात विवाहितेची आत्महत्या, नव-यासहीत सासरच्यांविरोधात गुन्हा

By admin | Updated: March 30, 2017 13:31 IST

नवरा आणि सासू-सास-याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - नवरा आणि सासू-सास-याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वृषाली आशुतोष हावरे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 
 
वृषालीच्या आत्महत्येसाठी तिचा नवरा, सासू-सासरे कारणीभूत असल्याची तक्रार तिच्या आईनं पोलिसात दिली. यानंतर अंबाझरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  
 
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतनगरातील सौजन्य अपार्टमेंटमध्ये राहणा-या वृषालीने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वृषालीचे माहेर दर्यापूर (जि.अमरावती) येथे आहे. मुलीनं आयुष्य संपवल्याची माहिती मिळल्यानंतर सासरी दाखल होत वृषालीच्या आईनं अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. 
 
वृषालीला तिचा नवरा आणि सासू सासरे तीन वर्षांपासून छळत होते. हा छळ असह्य झाल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे साबळे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी आशुतोष रमेश हावरे (वय ३८) त्याचे वडील रमेश हावरे (वय ६०) आणि आई उषा हावरे (वय ५८) यांच्याविरुद्ध कलम ३०४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला.