शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नागपूर शहर बस कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:45 IST

भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडून जमा करणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीकडून कामगारांच्या खात्यात महिन्याला फक्त १६८ रुपये जमा केले जातात. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याच्या आरोप भारतीय कामगार सेनेने केला आहे.

ठळक मुद्देभारतीय कामगार सेनेचा आरोप : आयुक्त अनिमेष मिश्रा यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडून जमा करणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीकडून कामगारांच्या खात्यात महिन्याला फक्त १६८ रुपये जमा केले जातात. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याच्या आरोप भारतीय कामगार सेनेने केला आहे.संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त अनिमेष मिश्रा यांना निवेदन दिले. यात संघटनेचे जिल्हा संघटक बंडू तळवेकर, संघटनेचे अध्यक्ष भाऊ राव रेवतकर, सचिव अंबादास शेंडे, मनोज कारोकार व विशाल राऊ त यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.ट्रॅव्हल्स टाइम कंपनीत ३२० कामगार आहेत. कामगारांच्या वेतनातून दर महिन्याला १२ टक्के ईपीएफ कपात करून व तितकीच रक्कम कंपनीने जमा करणे अपेक्षित आहे. त्यानुसार दर महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनातून ११३९ रुपये कपात होेणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक कामगाराचे महिन्याला १६८ रुपये जमा केले जातात. म्हणजेच एका कामगारामागे महिन्याला १९२६ रुपयांचा घोटाळा केला जात आहे. अशाप्रकारे ३२० कामगारांचे महिन्याला ६ लाख १६ हजार ३२० रुपये होतात. गेल्या सहा महिन्यात कंपनीने ३६ लाख ९७ हजार ९२० रुपयांचा घोटाळा केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांना माहिती दिल्यानंतरही कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही. तसेच कंपनीने ईएसआयची रक्कम न भरल्याने कामगारांना उपचार मिळत नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान कंपनीच्या विरोधात बेलतरोडी पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक