शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

नागपूर भूषण... भाई बर्धन

By admin | Updated: January 3, 2016 03:19 IST

ए. बी. बर्धन यांच्या निधनाची बातमी कळल्यावर नि:शब्दच झालो. गरीब, शोषित, वंचितांच्या हक्कासाठी लढणारे हे लढवय्ये नेतृत्व होते.

मजुरांचा ‘मसिहा’ : कामगारांचा हुंकारउमेश चौबेए. बी. बर्धन यांच्या निधनाची बातमी कळल्यावर नि:शब्दच झालो. गरीब, शोषित, वंचितांच्या हक्कासाठी लढणारे हे लढवय्ये नेतृत्व होते. बर्धन म्हणजे मजुरांचे ‘मसिहा’ होते. याचा अनुभव मी अनेकदा घेतला. सध्या नेतृत्वावर विश्वास ठेवता येत नाही, अशी स्थिती असताना बर्धन यांचे नेतृत्व गरीब, मजुरांसाठी अत्यंत आश्वासक होते. त्यांच्या निधनाने जाती, धर्म, पक्ष हे सारेच भेद विसरून काम करणारा मार्गदर्शक आणि आभाळभर उंचीचा नेता हरपल्याची भावना माझे मन विषण्ण करणारी आहे. आता खूप एकाकी वाटते आहे.खऱ्या अर्थाने नागपूर आणि देशात गरीब, मजुरांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व बर्धन यांचे होते. त्याकाळात आम्ही काँग्रेस पक्षातर्फे मजुरांचे आंदोलन करीत होतो. आमच्या आंदोलनाला बळ देण्याचे काम पक्षभेद विसरून बर्धन यांनी केले. शोषणमुक्तीसाठी आयुष्यभर कार्य करणारे बर्धन आम्हा सर्वांचेच आधारस्तंभ होते. गेली ६० वर्षे त्यांच्या सहवासात मला राहता आले आणि त्यांना जवळून अनुभवता आले. नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत मी उभा होतो. त्यावेळी बर्धन यांनी मला मदत केली त्यामुळेच मी निवडून येऊ शकलो. माझी विचारधारा वेगळी असताना बर्धन मला मदत करीत होते, त्यामुळेच त्यांच्याविषयीचे आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न मी केला. ते समतावादी विचारांचे होते पण सामाजिक समरसता सांभाळणारे होते. समाजात कुठलाही विखार निर्माण होऊ नये यावर त्यांचा कटाक्ष होता. गरिबांच्या उन्नतीसाठी कार्य करीत राहणे, हेच त्यांचे जीवनमूल्य होते.नागपुरात मजुरांची चळवळ उभी करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांनीच येथे एक वातावरण निर्मिती साधली होती. विद्यापीठात नंबुद्रीपाद यांना बोलावण्याची विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी ती पूर्णही केली होती.