शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

नागपूर भूषण... भाई बर्धन

By admin | Updated: January 3, 2016 03:19 IST

ए. बी. बर्धन यांच्या निधनाची बातमी कळल्यावर नि:शब्दच झालो. गरीब, शोषित, वंचितांच्या हक्कासाठी लढणारे हे लढवय्ये नेतृत्व होते.

मजुरांचा ‘मसिहा’ : कामगारांचा हुंकारउमेश चौबेए. बी. बर्धन यांच्या निधनाची बातमी कळल्यावर नि:शब्दच झालो. गरीब, शोषित, वंचितांच्या हक्कासाठी लढणारे हे लढवय्ये नेतृत्व होते. बर्धन म्हणजे मजुरांचे ‘मसिहा’ होते. याचा अनुभव मी अनेकदा घेतला. सध्या नेतृत्वावर विश्वास ठेवता येत नाही, अशी स्थिती असताना बर्धन यांचे नेतृत्व गरीब, मजुरांसाठी अत्यंत आश्वासक होते. त्यांच्या निधनाने जाती, धर्म, पक्ष हे सारेच भेद विसरून काम करणारा मार्गदर्शक आणि आभाळभर उंचीचा नेता हरपल्याची भावना माझे मन विषण्ण करणारी आहे. आता खूप एकाकी वाटते आहे.खऱ्या अर्थाने नागपूर आणि देशात गरीब, मजुरांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व बर्धन यांचे होते. त्याकाळात आम्ही काँग्रेस पक्षातर्फे मजुरांचे आंदोलन करीत होतो. आमच्या आंदोलनाला बळ देण्याचे काम पक्षभेद विसरून बर्धन यांनी केले. शोषणमुक्तीसाठी आयुष्यभर कार्य करणारे बर्धन आम्हा सर्वांचेच आधारस्तंभ होते. गेली ६० वर्षे त्यांच्या सहवासात मला राहता आले आणि त्यांना जवळून अनुभवता आले. नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत मी उभा होतो. त्यावेळी बर्धन यांनी मला मदत केली त्यामुळेच मी निवडून येऊ शकलो. माझी विचारधारा वेगळी असताना बर्धन मला मदत करीत होते, त्यामुळेच त्यांच्याविषयीचे आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न मी केला. ते समतावादी विचारांचे होते पण सामाजिक समरसता सांभाळणारे होते. समाजात कुठलाही विखार निर्माण होऊ नये यावर त्यांचा कटाक्ष होता. गरिबांच्या उन्नतीसाठी कार्य करीत राहणे, हेच त्यांचे जीवनमूल्य होते.नागपुरात मजुरांची चळवळ उभी करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांनीच येथे एक वातावरण निर्मिती साधली होती. विद्यापीठात नंबुद्रीपाद यांना बोलावण्याची विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी ती पूर्णही केली होती.