शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:39 IST

राज्यात माहितीचा अधिकार लागू झाल्यापासून राज्यातील विविध खंडपीठांचा कारभार संथ असल्याने प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत होते. मात्र माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या कामाचा वेग जास्त आहे.

ठळक मुद्देतक्रार निपटाऱ्याचे प्रमाण वाढीसमुख्यालय व बृहन्मुंबईनंतर नागपुरातच कमी प्रलंबित प्रकरणे

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात माहितीचा अधिकार लागू झाल्यापासून नागरिकांमध्ये याबाबत जागरुकता वाढते आहे. राज्यातील विविध खंडपीठांचा कारभार संथ असल्याने प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत होते. मात्र त्या तुलनेत माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या कामाचा वेग जास्त आहे. द्वितीय अपिल व तक्रारींची संख्या यांच्यासोबतच प्रकरण निकाली काढण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. आॅगस्ट अखेरीस मुख्यालय व बृहन्मुंबई खंडपीठानंतर सर्वात कमी प्रलंबित प्रकरणे नागपूर खंडपीठाकडे होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.डिसेंबर २०१६ पर्यंत नागपूर खंडपीठातील तक्रारी निपटाºयाचा वेग अतिशय संथ होता. खंडपीठाचा कारभार प्रभारी आयुक्तांच्या देखरेखीखाली सुरू होता. जानेवारी २०१७ ला नागपूर खंडपीठात राज्य माहिती आयुक्त म्हणून दिलीप धारुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निपटाऱ्याचे प्रमाण वाढीस लागले.जानेवारी २०१८ मध्ये खंडपीठाकडे ५२ तक्रारी प्रलंबित होत्या. मात्र त्यानंतर तक्रारी येण्याचा वेग वाढला. आॅगस्ट २०१८ पर्यंत ६४६ तक्रारी दाखल झाल्या. यापैकी ३५३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. आॅगस्ट अखेर प्रलंबित तक्रारींची संख्या ३४६ इतकी होती. २०१७ साली जुलै महिन्यात हाच आकडा १५४५ इतका होता.

केवळ ६५७ अपिल प्रलंबितद्वितीय अपिले व तक्रारींची प्रकरणे निकाली काढण्याचा वेग वाढला आहे. जुलै २०१७ मध्ये द्वितीय अपिलांची संख्या १५४५ इतकी होती. डिसेंबर २०१७ अखेरीस हा आकडा ९०३ इतका होता. त्यानंतरच्या आठ महिन्यात दाखल तक्रारींचे प्रमाण वाढले. जानेवारी ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत २५१३ द्वितीय अपिलं दाखल झाली. या कालावधीत २४०६ अपील निकाली काढण्यात आली. आॅगस्ट २०१८ अखेरीस नागपूर खंडपीठात ६५७ अपीलं प्रलंबित होती. द्वितीय अपिलांच्या निपटाऱ्यात बृहन्मुंबई खंडपीठानंतर नागपूर खंडपीठाचाच क्रमांक लागत आहे.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार