शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

नागपुरात ग्रामायणच्या दुसऱ्या सेवा प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:40 IST

अंध, मतिमंद व दिव्यांगांसाठी सेवा देणाºया संस्थांद्वारे तयार झालेल्या वस्तू, सेवाभावी संस्था व व्यावसायिकांसह गोशाळांमधील गोवस्तूंची उत्पादने, सेंद्रिय शेतकºयांनी आणलेले सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादक व ग्रामीण तसेच शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची रेलचेल असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली.

ठळक मुद्देदिव्यांग संस्था, गोवस्तू, सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादकांच्या वस्तूंची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंध, मतिमंद व दिव्यांगांसाठी सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे तयार झालेल्या वस्तू, सेवाभावी संस्था व व्यावसायिकांसह गोशाळांमधील गोवस्तूंची उत्पादने, सेंद्रिय शेतकऱ्यांनी आणलेले सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादक व ग्रामीण तसेच शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची रेलचेल असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. दैनंदिन जीवनात आवश्यक सर्व वस्तू खरेदी करून या सेवा संस्थांना मजबूत करण्याची संधी शहरवासीयांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशन, राजेंद्रसिंह दिव्यांग कौशल्य विकास केंद्र, भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद, अभाविप आणि ग्रामायण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण अंबाझरी मार्ग, दीक्षाभूमी चौकातील मुंडले इंग्लिश मिडियम स्कूल परिसरात या ग्रामायण सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी महापौर नंदा जिचकार, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सोहम पांड्या, व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, उद्योजक सुरेंद्र लोढा, ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, ब्लार्इंड रिलिफचे अध्यक्ष निखिल मुंडले, नागेश कानगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात प्रत्येक दिवशी एक थीम ठेवण्यात आली असून, पहिल्या दिवशीची ‘दिव्यांग संमेलन’ ही संकल्पना होती. यानिमित्त अपघातात एक पाय गमावल्यानंतरही जिद्दीने एव्हरेस्ट सर करणारा अपंग गिर्यारोहक अशोक मुन्ने यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी मनोगतातून आपला प्रवास उलगडला. यावेळी नंदा जिचकार यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या जिद्द आणि संघर्षाची अभिव्यक्ती म्हणजे ग्रामायण होय, असे मनोगत व्यक्त केले. जुन्या काळात ग्रामीण क्षेत्र श्रीमंत होते, कारण त्यांच्याकडे संभाव्य गोष्टी होत्या. ही समृद्धी पुन्हा जागे करण्याची गरज आहे, असे मत बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले. कृषिमालावर प्रक्रिया करून उद्योजक १०० पट नफा कमावतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिमालाच्या मोलाची जाणीव करून देणे गरजेचे असल्याची भावना सोहम पांड्या यांनी व्यक्त केली. संचालन संजय सराफ यांनी केले. 

देवलापारच्या गो-शाळेची प्रतिकृती व ग्रामविज्ञानदेवलापार येथील गो-शाळा व गो-विज्ञान संशोधन केंद्राचे महत्त्व सर्वत्र पसरले आहे. गोपालन आणि गोधन कृषीचे महत्त्व दर्शविणारी प्रतिकृती ग्रामायण सेवा प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधत आहे. या गो-शाळेत गोधनाद्वारे मिळणाऱ्या वस्तूंवर संशोधन करून जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती केली जाते. पंचगव्य, कामधेनू कीटकनाशक, गोमयादी लेप साबण, दंतमंजन, तेल, धूप अशा सर्व वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. दुसरीकडे वर्धा येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात निर्माण होणाऱ्या वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. गावाच्या विकासासाठी तंत्रज्ञान व संशोधन गावापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान पोहचविणाऱ्या या केंद्राद्वारे निर्माण केलेल्या वस्तू वनौषधी, फूड प्रोसेसिंग, मधमाशी पालन, आरोग्यम् वॉटर फिल्टर, अ‍ॅग्रोवेस्ट शेगडी आदी प्रदर्शनात आहेत. याशिवाय सेंद्रिय शेतकऱ्यांनी उत्पादन केलेले आॅर्गनिक धान्य, ताज्या भाज्या, महिला बचत गटांद्वारे तयार केलेले खाद्यपदार्थ, शुद्ध तेल, गाईचे तूप, हस्तनिर्मित बॅग, कपडे, पादत्राणे अशा जीवनावश्यक वस्तूंसह विदर्भातील ग्रामीण भागात अभावग्रस्तांसाठी सेवा देणाऱ्या
संस्थांची माहिती या प्रदर्शनात बघावयास मिळत आहे.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर