शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आंतरराष्ट्रीय परिषदेतील घोषणापत्राचा नागपूरलाही लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:15 IST

इंदूर येथील ब्रिलियन्ट कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आठव्या रिजनल ‘थ्री आर फोरम इन एशिया अ‍ॅन्ड दि पॅसिफिक ’या आंतरराष्ट्रीय परिषदेत आशियातील ३७ शहरांतील महापौरांनी एका ऐतिहासिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी इंदूरच्या महापौर मालिनी गौड यांनी घोषणापत्र सादर केले. याचा नागपूर शहराला लाभ होणार आहे.

ठळक मुद्देइंदूर येथे आयोजन : महापौर नंदा जिचकार यांच्यासह देश-विदेशातील महापौरांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदूर येथील ब्रिलियन्ट कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आठव्या रिजनल ‘थ्री आर फोरम इन एशिया अ‍ॅन्ड दि पॅसिफिक ’या आंतरराष्ट्रीय परिषदेत आशियातील ३७ शहरांतील महापौरांनी एका ऐतिहासिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी इंदूरच्या महापौर मालिनी गौड यांनी घोषणापत्र सादर केले. याचा नागपूर शहराला लाभ होणार आहे.घोषणापत्रावर नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनीही स्वाक्षरी केली आहे. सन २०३० पर्यंत कचऱ्याच्या समस्येपासून मुक्ती मिळविणे हा या घोषणापत्राचा उद्देश आहे. यासाठी घोषणापत्रानुसार, थ्री आर या त्रिसूत्रीच्या आधारावर आशिया खंडातील सर्व देश एकत्र येऊन काम करतील आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘मिशन झिरो वेस्ट’यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या बैठकीत यावर करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत सर्व देश आपली भूमिका मांडतील, असा निर्णय परिषदेत घेण्यात आला.कचरामुक्तीकडे वाटचालसदर घोषणापत्र म्हणजे कचरामुक्तीच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. या घोषणापत्रानुसार आता नागपूरमध्ये कचरामुक्तीसाठी, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी कार्य केले जाईल. आशिया खंडातील विविध देशांनी घेतलेल्या या पुढाकाराचा फायदा नागपूरला होईल.नंदा जिचकार, महापौर नागपूर.

टॅग्स :Nanda Jichakarनंदा जिचकारNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका