शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

.. तर नागपूर विमानतळ  धावपट्टीची लांबी होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:52 IST

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एअरक्रॉफ्ट नियम-१९९४ नुसार ग्रीडनिहाय उंची निर्धारित केली आहे. पण त्याचे उल्लंघन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. अटींचे उल्लंघन झाल्याने विमानातील ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग (जीपीडब्ल्यू) यंंत्रणा वैमानिकांना धोक्याचा इशारा देत आहे. उंच इमारतींवर स्थानिक प्राधिकरणाने कारवाई न केल्यास भविष्यात धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करावी लागेल, असा इशारा नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी दिला.

ठळक मुद्दे विजय मुळेकर : उंच इमारतींमुळे विमानांना धोका, सात इमारतींना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एअरक्रॉफ्ट नियम-१९९४ नुसार ग्रीडनिहाय उंची निर्धारित केली आहे. पण त्याचे उल्लंघन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. अटींचे उल्लंघन झाल्याने विमानातील ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग (जीपीडब्ल्यू) यंंत्रणा वैमानिकांना धोक्याचा इशारा देत आहे. उंच इमारतींवर स्थानिक प्राधिकरणाने कारवाई न केल्यास भविष्यात धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करावी लागेल, असा इशारा नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी दिला.हिरव्या झोनमधील बांधकामास १५ दिवसात मंजुरीएएआय नागपूरतर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुळेकर म्हणाले, नागपूर विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ३२०० मीटर आहे. लांबी कमी झाल्यास मोठी आणि मालवाहू विमाने विमानतळावर उतरण्यास अडचण होईल. त्यामुळे ‘एमआयएल’ला आर्थिक नुकसान सोसावे लागेल. विमानतळ परिसरात होणाºया बांधकामांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. बांधकाम हिरव्या झोनमध्ये असल्यास प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘नोकॉस-२’ या आॅनलाईन अप्लीकेशन प्रणालीद्वारे १५ दिवसात प्रमाणपत्र देण्यात येते. पण धावपट्टीलगतच्या जयताळा आणि चिचभुवन परिसरात उंच इमारती उभ्या आहेत. ही बाब २०१६-१७ च्या सर्वेक्षणात पुढे आल्यानंतर सात इमारतींना एमआयएलने नोटिसा जारी केल्या आहेत.मोठ्या विमानांवर प्रतिबंध लागणारया संदर्भात मनपाचा प्लॅनिंग टाऊन विभाग आणि नागरी उड्ड्यण महासंचालनालयाशी (डीजीसीए) पत्रव्यवहार केला आहे. वैमानिकही विमान नियंत्रकाकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. तक्रारींवर कारवाई होत नसेल तर विमानतळाची लांबी कमी करणे आणि मालवाहू व मोठ्या विमानांना विमानतळावर उतरण्यावर प्रतिबंध घालण्याशिवाय प्राधिकरणाकडे पर्याय राहणार नाही. भविष्यात विमानांना चिचभुवनकडून नव्हे तर विमानतळाला वळसा घालून जयताळा परिसरातून धावपट्टीवर उतरावे लागेल. त्यामुळे सध्याच्या कालावधीपेक्षा १० मिनिटे जास्त लागेल व इंधनाचा खर्च वाढेल, असे मुळेकर यांनी स्पष्ट केले. अद्ययावत रडार यंत्रणेमुळे विमान धावपट्टीवर उतरण्याचा वेळ ५ मिनिटांनी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.प्रस्तावित कार्गो धावपट्टीवर परिणाम होणारउंच इमारतींमुळे प्रस्तावित कार्गो धावपट्टीच्या उभारणीवर परिणाम होणार आहे. प्रस्तावित ४२०० मीटर लांबीच्या धावपट्टीची लांबी कमी करावी लागेल. शिवाय खासगी कंपन्यांच्या माध्यमातून विमानतळाची विकास कामे थांबतील. स्थानिक प्राधिकरणाने विमानतळालगतच्या बांधकामांना मंजुरी देऊ नये, असे ते म्हणाले.

टॅग्स :Airportविमानतळnagpurनागपूर