शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

.. तर नागपूर विमानतळ  धावपट्टीची लांबी होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:52 IST

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एअरक्रॉफ्ट नियम-१९९४ नुसार ग्रीडनिहाय उंची निर्धारित केली आहे. पण त्याचे उल्लंघन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. अटींचे उल्लंघन झाल्याने विमानातील ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग (जीपीडब्ल्यू) यंंत्रणा वैमानिकांना धोक्याचा इशारा देत आहे. उंच इमारतींवर स्थानिक प्राधिकरणाने कारवाई न केल्यास भविष्यात धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करावी लागेल, असा इशारा नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी दिला.

ठळक मुद्दे विजय मुळेकर : उंच इमारतींमुळे विमानांना धोका, सात इमारतींना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एअरक्रॉफ्ट नियम-१९९४ नुसार ग्रीडनिहाय उंची निर्धारित केली आहे. पण त्याचे उल्लंघन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. अटींचे उल्लंघन झाल्याने विमानातील ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग (जीपीडब्ल्यू) यंंत्रणा वैमानिकांना धोक्याचा इशारा देत आहे. उंच इमारतींवर स्थानिक प्राधिकरणाने कारवाई न केल्यास भविष्यात धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करावी लागेल, असा इशारा नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी दिला.हिरव्या झोनमधील बांधकामास १५ दिवसात मंजुरीएएआय नागपूरतर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुळेकर म्हणाले, नागपूर विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ३२०० मीटर आहे. लांबी कमी झाल्यास मोठी आणि मालवाहू विमाने विमानतळावर उतरण्यास अडचण होईल. त्यामुळे ‘एमआयएल’ला आर्थिक नुकसान सोसावे लागेल. विमानतळ परिसरात होणाºया बांधकामांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. बांधकाम हिरव्या झोनमध्ये असल्यास प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘नोकॉस-२’ या आॅनलाईन अप्लीकेशन प्रणालीद्वारे १५ दिवसात प्रमाणपत्र देण्यात येते. पण धावपट्टीलगतच्या जयताळा आणि चिचभुवन परिसरात उंच इमारती उभ्या आहेत. ही बाब २०१६-१७ च्या सर्वेक्षणात पुढे आल्यानंतर सात इमारतींना एमआयएलने नोटिसा जारी केल्या आहेत.मोठ्या विमानांवर प्रतिबंध लागणारया संदर्भात मनपाचा प्लॅनिंग टाऊन विभाग आणि नागरी उड्ड्यण महासंचालनालयाशी (डीजीसीए) पत्रव्यवहार केला आहे. वैमानिकही विमान नियंत्रकाकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. तक्रारींवर कारवाई होत नसेल तर विमानतळाची लांबी कमी करणे आणि मालवाहू व मोठ्या विमानांना विमानतळावर उतरण्यावर प्रतिबंध घालण्याशिवाय प्राधिकरणाकडे पर्याय राहणार नाही. भविष्यात विमानांना चिचभुवनकडून नव्हे तर विमानतळाला वळसा घालून जयताळा परिसरातून धावपट्टीवर उतरावे लागेल. त्यामुळे सध्याच्या कालावधीपेक्षा १० मिनिटे जास्त लागेल व इंधनाचा खर्च वाढेल, असे मुळेकर यांनी स्पष्ट केले. अद्ययावत रडार यंत्रणेमुळे विमान धावपट्टीवर उतरण्याचा वेळ ५ मिनिटांनी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.प्रस्तावित कार्गो धावपट्टीवर परिणाम होणारउंच इमारतींमुळे प्रस्तावित कार्गो धावपट्टीच्या उभारणीवर परिणाम होणार आहे. प्रस्तावित ४२०० मीटर लांबीच्या धावपट्टीची लांबी कमी करावी लागेल. शिवाय खासगी कंपन्यांच्या माध्यमातून विमानतळाची विकास कामे थांबतील. स्थानिक प्राधिकरणाने विमानतळालगतच्या बांधकामांना मंजुरी देऊ नये, असे ते म्हणाले.

टॅग्स :Airportविमानतळnagpurनागपूर