शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नागपूर मनपाचा उन्हाळ्यासाठी ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 10:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपारी १ ते ४ या उन्हाच्या वेळात काम करणाऱ्या कामगारांचे काम बंद करावे, त्यांना सावलीत विश्रांती द्यावी, अशा सूचना ...

ठळक मुद्देशहरातील उद्याने दिवसभर सुरूदुपारी विश्रांती घेण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपारी १ ते ४ या उन्हाच्या वेळात काम करणाऱ्या कामगारांचे काम बंद करावे, त्यांना सावलीत विश्रांती द्यावी, अशा सूचना सर्व विभागाला महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. कामगारांना उन्हात विश्रांतीसाठी शहरातील सर्व उद्याने खुले करण्यात आली आहेत. तसेच नागपुरातील प्रमुख चौकांमध्ये पाणपोईची सोय करण्यात आली आहे.नागपूरसह विदर्भात उन्हाळ्यातील तापमान ४४-४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत वाढलेल्या तापमानामुळे लोकांच्या आरोग्याच्याही समस्या निर्माण होतात. दुपारच्या उन्हात घराबाहेर पडणे अशक्य होते. पण कामगारांना पोट भरण्यासाठी काम करायला घराबाहेर पडावेच लागते. अकुशल कामगारांना तर उन्हातच काम करावे लागत असल्याने त्यांना उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. दरवर्षी हजारो नागरिकांना उष्माघातामुळे आजारी पडावे लागते. अनेकदा यात मृत्यू होण्याची शक्यता असते.मागील काही वर्षांत उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात हिट अ‍ॅक्शन प्लॅन लागू केला. यानुसार शक्यतो दुपारी १ ते ४ या वेळेत काम करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच शहराच्या सर्व प्रमुख ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मोठ्या मॉल्समध्ये एक शीतखोली तयार केली जाणार आहे. शहरातील सर्व गार्डन दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास त्याच्यावर उपचारासाठी १०८ या क्रमांकाच्या दूरध्वनीवर त्वरित अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध होईल, अशा २५ अ‍ॅम्बुलन्स सज्ज राहणार आहते. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये शीत वॉर्ड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शाळा सकाळी भरणारवाढत्या उन्हाचा प्रभाव बघता दुपारच्या सत्रातील शाळा सकाळच्या सत्रात घेतल्या जाणार आहे. नागरिकांनी उष्माघातापासून कसा बचाव करावा, हे सांगण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहते. उन्हाळा अनेकदा जीवावर बेतण्याची भीती असते. त्यामुळे महापालिकेच्या या हिट अ‍ॅक्शन प्लॅनचा उपयोग नागरिकांना होणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका