शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर मनपाचा उन्हाळ्यासाठी ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 10:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपारी १ ते ४ या उन्हाच्या वेळात काम करणाऱ्या कामगारांचे काम बंद करावे, त्यांना सावलीत विश्रांती द्यावी, अशा सूचना ...

ठळक मुद्देशहरातील उद्याने दिवसभर सुरूदुपारी विश्रांती घेण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपारी १ ते ४ या उन्हाच्या वेळात काम करणाऱ्या कामगारांचे काम बंद करावे, त्यांना सावलीत विश्रांती द्यावी, अशा सूचना सर्व विभागाला महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. कामगारांना उन्हात विश्रांतीसाठी शहरातील सर्व उद्याने खुले करण्यात आली आहेत. तसेच नागपुरातील प्रमुख चौकांमध्ये पाणपोईची सोय करण्यात आली आहे.नागपूरसह विदर्भात उन्हाळ्यातील तापमान ४४-४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत वाढलेल्या तापमानामुळे लोकांच्या आरोग्याच्याही समस्या निर्माण होतात. दुपारच्या उन्हात घराबाहेर पडणे अशक्य होते. पण कामगारांना पोट भरण्यासाठी काम करायला घराबाहेर पडावेच लागते. अकुशल कामगारांना तर उन्हातच काम करावे लागत असल्याने त्यांना उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. दरवर्षी हजारो नागरिकांना उष्माघातामुळे आजारी पडावे लागते. अनेकदा यात मृत्यू होण्याची शक्यता असते.मागील काही वर्षांत उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात हिट अ‍ॅक्शन प्लॅन लागू केला. यानुसार शक्यतो दुपारी १ ते ४ या वेळेत काम करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच शहराच्या सर्व प्रमुख ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मोठ्या मॉल्समध्ये एक शीतखोली तयार केली जाणार आहे. शहरातील सर्व गार्डन दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास त्याच्यावर उपचारासाठी १०८ या क्रमांकाच्या दूरध्वनीवर त्वरित अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध होईल, अशा २५ अ‍ॅम्बुलन्स सज्ज राहणार आहते. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये शीत वॉर्ड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शाळा सकाळी भरणारवाढत्या उन्हाचा प्रभाव बघता दुपारच्या सत्रातील शाळा सकाळच्या सत्रात घेतल्या जाणार आहे. नागरिकांनी उष्माघातापासून कसा बचाव करावा, हे सांगण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहते. उन्हाळा अनेकदा जीवावर बेतण्याची भीती असते. त्यामुळे महापालिकेच्या या हिट अ‍ॅक्शन प्लॅनचा उपयोग नागरिकांना होणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका