शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

नागपुरात एप्रिलमध्ये ६७२ वेळा बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 10:44 IST

शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना तापमानाचे चटके सहन करावे लागत आहेत.

ठळक मुद्देमहिनाभरात सतत ब्रेकडाऊननागरिकांना बसताहेत तापमानाचे चटके

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना तापमानाचे चटके सहन करावे लागत आहेत. ही समस्या विशेषत: एसएनडीएलच्या क्षेत्रात पहायला मिळत आहे. महावितरणच्या अहवालावरून ही बाब उघडकीस आली आहे.अहवालानुसार एप्रिलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ३३ केव्ही लाईनचे एकूण ६७२ वेळा म्हणजे, रोज २२.४ वेळा ब्रेकडाऊन झाले. त्यावरून दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत असल्याचे सिद्ध होते कारण, ११ केव्ही व अन्य किरकोळ बिघाडामुळे वीज पुरवठा बंद होण्याच्या आकडेवारीचा यात समावेश नाही. महावितरण ३३ केव्ही लाईनमध्ये झालेल्या ब्रेकडाऊनचा अहवाल दर महिन्यात मुख्यालयाला सादर करते. त्या अहवालामध्ये एसएनडीएल क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या बिघाडाचा समावेश असतो. एसएनडीएल क्षेत्रात अनेक ब्रेकडाऊन झाले आहेत. महावितरण अधिकारी उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असल्यामुळे ब्रेकडाऊन होत असल्याचा दावा करीत आहेत. उन्हाळ्यात वीज उपकरणे लवकर तापतात. ती थंड रहावी याकरिता कुलर लावण्यात आले आहेत. परंतु, बहुतांश उपकरणे मोकळ्या जागेवर असल्याने त्यांना थंड ठेवणे शक्य होत नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.एसएनडीएलनुसार तापमानासह वीज पुरवठ्यावरचा दबावही वाढला आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी ४११ एमव्हीए विजेच्या मागणीची नोंद झाली होती. यावर्षी या महिन्याच्या दुसºया आठवड्यातच विजेची मागणी ३७५ एमव्हीएपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मागणी लवकरच ४११ एमव्हीएचा उच्चांक ओलांडण्याची शक्यता आहे. मागणी वाढल्यामुळे तांत्रिक बिघाड होत आहेत.खोदकामही कारणीभूतवीज कंपन्यांच्या माहितीनुसार, शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग, ओसीडब्ल्यू, मेट्रो आदी संस्था विविध कामांसाठी खोदकाम करीत आहेत. दरम्यान, अनेकदा वीज केबलचे नुकसान होते. त्यामुळे वीजपुरवठा बंद होतो. केबल जोडल्यानंतर तो भाग अधिक दबाव सहन करू शकत नाही. जोड उघडा पडून ब्रेकडाऊन होतो.दिलासा नाही, आराखडा मात्र तयारवीजपुरवठा बंद होण्यापासून दिलासा मिळण्याची काहीच आशा नाही. एसएनडीएलमधील सूत्रानुसार, शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज लाईनमध्ये शिरल्या आहेत. केवळ बुधवारी वीजपुरवठा बंद करून त्या फांद्या तोडणे अशक्य आहे. त्यामुळे रोज सकाळी वीजपुरवठा बंद करून फांद्या तोडण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी ४५ दिवसात ९३ वर ब्रेकडाऊन झाल्याचे स्वीकारले आहे. तसेच, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडा तयार असल्याचा दावा केला आहे. विकासकामे करताना केबल तोडण्यात आल्यामुळे २५ वर ब्रेकडाऊन झाल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.सकाळी मेडिकल, सायंकाळी महालचे हालमेडिकल फिडर अंतर्गतच्या परिसरात शुक्रवारी बरेच तास वीज बंद होती. एसएनडीएलच्या माहितीनुसार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरातील झाडे कापण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. तसेच, दाब दुसºया फिडरवर स्थानांतरित केल्यामुळे वीजपुरवठा प्रभावित झाला. सायंकाळी महाल परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा बंद पडला. याशिवाय मनीषनगर येथील बाळकृष्ण कंदिले यांच्या घरचा वीजपुरवठा रात्री बंद होता. वारंवार तक्रार करूनही त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही.

टॅग्स :electricityवीज