शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आजपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:17 IST

मध्य प्रदेशच्या पचमढी येथे गुरुवार, २५ जुलैपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा प्रशासनाने पावसाअभावी काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. पाऊस आल्यानंतरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय महादेव यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात २५ जुलैला प्रशासनाची बैठक होणार आहे. पावसामुळे नागद्वार यात्रा स्थगित करण्याची कदाचित पहिलीच वेळ आहे.

ठळक मुद्दे पावसाअभावी प्रशासनाचा निर्णय : ८० टक्के भाविक विदर्भातील

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मध्य प्रदेशच्या पचमढी येथे गुरुवार, २५ जुलैपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा प्रशासनाने पावसाअभावी काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. पाऊस आल्यानंतरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय महादेव यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात २५ जुलैला प्रशासनाची बैठक होणार आहे. पावसामुळे नागद्वार यात्रा स्थगित करण्याची कदाचित पहिलीच वेळ आहे.या यात्रेसाठी विदर्भातील ८० टक्के शिवभक्त जातात. त्यात सर्वाधिक भाविक नागपूरचे असतात. यात्रेसाठी भाविकांची महिन्यापूर्वीच तयारी सुरू असते. याशिवाय नागपुरातील अनेक मंडळाचे पदाधिकारी यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी या ठिकाणी हजर असतात. सध्या अनेक मंडळाचे पदाधिकारी धर्मशाळेत थांबले आहेत. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शिवभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.अनेक वर्षांपासून नागपंचमीनिमित्त पचमढी येथे नागद्वार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सातपुडा पर्वतरांगांमध्ये अत्यंत दुर्गम भागात नागद्वार स्वामीचे मंदिर आहे. भाविक तीन पर्वतांची १५ कि़मी. परिक्रमा करून मंदिरात दर्शन घेतात. पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे पर्वतावरून वाहणाºया नद्या कोरड्या आहेत. धूपगड येथील गणेश मंदिराजवळील आणि पश्चिम द्वार येथील नदी कोरडी आहे. भाविकांना धूपगड येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पाऊस नसल्यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भणार आहे. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता मध्य प्रदेश शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी नागद्वार यात्रा क्षेत्राची पाहणी केली. पाण्याअभावी या भागात आजार पसरू शकतात, या शक्यतेने प्रशासनाने यात्रा स्थगित केल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रशासकीय महादेव यात्रा समितीने सेवा आणि यात्रेसाठी येणाऱ्या नागद्वार सेवा मंडळाला पचमढीत येण्यास प्रतिबंध लावले आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMadhya Pradeshमध्य प्रदेश