शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

आठ वर्षांत पूर्ण होईल नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाच्या वित्त समितीची मान्यता मिळाल्यानंतर नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प आठ वर्षांत पूर्ण केला ...

नागपूर : राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाच्या वित्त समितीची मान्यता मिळाल्यानंतर नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प आठ वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाद्वारे अंमलात आणला जाणार आहे. प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संचालनालयाच्या वित्त समितीने हिरवी झेंडी दाखवल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्टची नियुक्ती केली जाईल व पुढे प्रकल्प मान्यतेची अधिसूचना जारी होईल. हा २ हजार ११७ कोटी ५६ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प असून, जपानीज इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने या प्रकल्पाकरिता १ हजार ८६३ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास सहमती दर्शवली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार १ हजार ३३७ कोटी ९३ लाख (६० टक्के), राज्य सरकार ४८७ कोटी २७ लाख (२५ टक्के) तर, महानगरपालिका २९२ कोटी ३६ लाख (१५ टक्के) रुपये देणार आहे. मनपाने २०२१ मध्ये या प्रकल्पाकरिता २ कोटी रुपयाची तरतूद केली आहे. या प्रकल्पानंतर नाग नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हातात घेतला जाईल, अशी माहिती मनपाने न्यायालयाला दिली.

-----------------

यांच्यामुळे गोसेखुर्द धरण प्रदूषित

गोसेखुर्द धरण केवळ नागपूर व नाग नदीमुळे नाही, तर कन्हान व वैनगंगा नदी आणि या नद्यांवरील गावांमुळेही प्रदूषित होत आहे, असा दावा मनपाने केला. नागपुरातून वाहणाऱ्या नाग नदी व पिली नदी या पुनापूर येथे एकत्र होऊन पुढे कन्हान नदीला मिळतात. कन्हान नदी वैनगंगा नदीत मिसळते. गाेसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणात या सर्व नद्यांमधील सांडपाणी गोळा होते. नाग नदीच्या काठावर नागपूरसह पोवारी, धारगाव, आसोली, महालगाव, सावली, गारला, पळसाद, निंभा, शिवनी, भामरेवाडा, झाल, विरंभा, चानोरा, नवेगाव, चापेगाडी व बोरगाव, कन्हान नदीच्या काठावर राजोला, कन्हेरी, लोहारा, पेवठा, चिचोली, आवरमारा व पिपरी, तर वैनगंगा नदीच्या काठावर तिड्डी, पवनी, आंबोरा, मंडी, जामगाव, वडद, हाटगाव, सावरगाव, बाळापूर, सानदल, खापरी, तामसवाडी, पानरी, पेंढारी, मालनी, जीवनपूर, कुक्कड ढुमरी व गोसेखुर्द ही गावे वसली आहेत. ही सर्व गावे पाणी प्रदूषणाकरिता कारणीभूत आहेत, असे मनपाने स्पष्ट केले.

---------

नाग व पिली नदीवर एसटीपी

नाग नदीवर व्हीएनआयटी परिसरात १२ एमएलडी, मोर भवन परिसरात ३५ एमएलडी व मोक्षधाम येथे ५ एमएलडी, तर पिली नदीवर नारा येथे ४५ एमएलडी व मानकापूर येथे ५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प (एसटीपी) उभारला जाणार आहे. या नद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी या प्रकल्पांकडे वळवून शुद्ध केले जाईल व त्यानंतर नद्यांमध्ये सोडले जाईल. मनपाद्वारे २०१२ पासून या दोन्ही नद्यांची दरवर्षी स्वच्छता व खोलीकरण केले जाते; परंतु, नागरिक कचरा फेकत असल्यामुळे स्वच्छता फार काळ टिकून राहत नाही, असे मनपाने सांगितले.

-------------------

राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय प्रतिवादी

नाग नदी प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवनाकरिता उच्च न्यायालयाने २०२० मध्ये स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यात मनपाने सदर प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाने ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती देण्यासाठी या प्रकरणात राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाला प्रतिवादी करून घेतले. तसेच संचालनालयाला नोटीस बजावून यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ॲड. निखिल पाध्ये यांनी न्यायालय मित्र म्हणून, तर मनपाच्या वतीने ॲड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.