शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:18 IST

राज्य सरकार कोरोना निर्मूलनाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान राज्यभर राबवीत आहे. १५ सप्टेंबरपासून अभियान सुरू झाले असून, दीड महिना राबविण्यात येणार आहे. परंतु या अभियानाचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, ते एक एक करून आपल्या जबाबदारीतून बाहेर पडत आहेत.

ठळक मुद्दे‘आशा’ स्वयंसेविकाही काढणार सहभाग : ५ पासून जाणार बेमुदत संपावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार कोरोना निर्मूलनाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान राज्यभर राबवीत आहे. १५ सप्टेंबरपासून अभियान सुरू झाले असून, दीड महिना राबविण्यात येणार आहे. परंतु या अभियानाचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, ते एक एक करून आपल्या जबाबदारीतून बाहेर पडत आहेत. अंगणवाडी सेविकांनी नकार दिल्यानंतर स्वयंसेवकसुद्धा उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी फक्त ‘आशा’ स्वयंसेविकांवर आली. आता आशांनीही सहभाग काढण्याचा निर्णय घेतला असून, ५ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासनाचे हे महत्त्वपूर्ण अभियान जिल्ह्यात वाºयावर आहे.या अभियानाच्या माध्यमातून सरकार व्यापक सर्वेक्षण करणार होते. जास्तीत जास्त लोकांना टेस्ट करण्यास प्रोत्साहित करणार होते. प्रत्येक ५० कुटुंबामागे एक टीम वॉच ठेवणार होती. पण हे अभियान जिल्ह्यात वादग्रस्त ठरले आहे. अंगणवाडी सेविकांनी काही अटी शासनापुढे ठेवल्या असून, शासन त्यावर निर्णय घेण्यास सक्षम नसल्याने त्यांनी सर्वेक्षणास नकार दिला. सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकसुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही. ‘आशा’ स्वयंसेवक कशाबशा सर्वेक्षण करीत होत्या. परंतु आता आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने बेमूदत कामबंदचा इशारा दिला आहे. सीटूच्या प्रतिनिधीमंडळाने महापालिकेचे सहा. अप्पर आयुक्त राम जोशी यांच्यापुढे आपले गाºहाणे मांडण्याचा प्रयत्न केला. २८ सप्टेंबर रोजी त्यांना बोलाविले होते. पण कक्षात घेतले नाही. परत ३० सप्टेंबर रोजी पुन्हा त्यांना बोलाविण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या कार्यालयात गेले. कक्षापुढे बराच वेळ उभे राहिले. पण प्रतिनिधीमंडळाला बोलाविण्यात आले नाही. अधिकारी चर्चा करायला तयार नाहीत, शासन ऐकायला तयार नाही, त्यामुळे ५ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय आशा स्वयंसेविकांनी घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले.

अशा आहेत मागण्या१) आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोरोना कामाचे ३०० रु. रोज द्यावेत.२) कोरोना सर्व्हे करताना मुबलक सुरक्षा साहित्य द्यावे.३) कोरोनाबाधीत झालेल्या आशा किंवा गट प्रवर्तक यांचे मानधन कपात करू नये.४) आशा व गट प्रवर्तक यांची प्रताडना थांबवावी.५) सर्व्हे करताना आशांसोबत आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवक देण्यात यावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर